Friday, 30 December 2011

मुलगी आणि तिचे समाजातील स्थान

आज आपण मुलगी आणि तिचे समाजातील स्थान या विषयावर चर्चा करूया...असा कुठेतरी वाचला कि भारता मध्ये दर वर्षी १० लाख नव जात बालिकेची हत्या केली जाते आणि म्हणून आपल्या देशात लिंग निदान चाचणी ला सरकारने बंदी घातली आहे...आज फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर स्त्री पुरुष प्रमाण १०००/९२६ असा आहे. उत्तरेकडील एका राज्यात..जर लग्न करायचे असेल तर मुलीला विकत आणावे लागते....अगदी सुरुवातीपासून मुलींबद्दल समाजाने द्वेषाची भूमिका का ठेवली आहे तेच काळात नाही...मुलीना शाळेत नाही पाठवायचे....पण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रयत्नाने सध्या मुलीना शिक्षण उपलब्ध आहे. पण मुलगी चे अति शिक्षण हेच तिच्या घाताचे ठरतेय....लग्न जमवताना हाच विचार केला जातो कि मुली चे शिक्षण आणि income हे मुलापेक्षा कमी आहे का? ..काय गरज आहे याची? संसार थाटताना दोघांचाही तेवढाच हाथभार असतो..मग हा विचार का केला जातो....जर बायको जास्त शिकलेली आणि जास्त कमावणारी असेल तर त्याचा अभिमान बाळगावा...

मी जेव्हा दुसरी-तिसरी ला होतो तेव्हा पुस्तकातले धडे अशेच होते..."गोपाळ शाळेत जा....लीला पाणी आण"...इथूनच जर भेदभाव शिकवत गेलो तर पुढे तेच विचार विकसित होत जातात...मुली सुद्धा याला जबाबदार आहेत....स्त्री-पुरुष समानता असताना का हवंय "स्त्रियांसाठी आरक्षण"... ते आरक्षण मागता म्हणजे तुम्ही दुसर्या भाषेत अजूनही कमकुवत आहात असा दाखवून देता.....माझ्या बर्याच मैत्रिणींकडून मी असा ऐकलय कि...लग्न झाल्यावर मला माझा नवरा जसा वागवेल तसा वागेन....मला समाजात नाही...लग्न करणे म्हणजे तुरुंगात जाने किवा एखाद्याची दासी बनून राहणे असे आहे का? मला एवढेच सांगायचे आहे कि....आत्मसन्मान बाळगा....स्वतःला कमी लेखू नका....आणि मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी आहे त्यामुळे तुमची मागणी वाढलेली आहे....योग्य असा जीवनसाथी निवडण्याचा तुमचा अधिकार आहे. मुलगा एका घराचे नव रोषण करतो तर मुली ला दोन घरांचे नाव रोषण करता येते. ते रोषण करायचे कि मान खाली घालवायला लावायची हे मुलीनु तुम्हीच ठरवा...

लग्न झाल्यावर जेव्हा मुलगा होत नाही तेव्हा स्त्रीला वांझोटी असा बोलून हिणवले जाते ...नवर्याच्या घरी काही अघटीत घडले तर पांढऱ्या पायाची अवदसा असा बोलला जात.... मुलगी जन्माला आली तरी स्त्री ला जबाबदार धरले जाते .पण science सांगते कि मुलगा किवा मुलगी होणे हे फक्त आणि फक्त पुरुषावर अवलंबून असते...स्त्री ने घरातील सर्व काम करून, मुलांना सांभाळून जॉब सुद्धा करावा ....किती अपेक्षा.....केवळ एक मुलगी आहे म्हणून.....तुमच्या घरात लग्न होवून आलेली मुलगी हि लक्ष्मि चे रूप असते...तिला दुखी ठेवून सुख मिळणार नाही....आणि केवळ विश्वासाच्या नात्याने आपल्या आई- पप्पा, मित्र-मैत्रिणी , भावू-बहिण सगळ्यांना सोडून आलेली असते....तिला समजून घेतले गेले पाहिजे...

राजा राम मोहन रॉय यांच्या सहकार्याने सती ची अनिष्ट प्रथा बंद झाली...महात्मा फुले यांच्या सहकार्याने समाजाने विधवा पुअर्विवाह मान्य केला...परंतु....जेव्हा तिच्या नवऱ्याचा देह अंत्यविधी साठी नेत असतात तेव्हा स्त्रियांच्या अंगावरील दागिने ज्या पद्धतीने काढले जातात , कपाळावरील कुंकू जबरदस्तीने पुसले जाते....हाताला काच लागेपर्यंत हातातील बांगड्या फोडल्या जातात.....आणि हे सर्व १०० -२०० पुरुषांच्या समोर होत असते....एक विचार करा...त्या स्त्री ला काय वाटत असेल...दुक्खातून सावरलेली पण नसेल ती आणि केवळ रूढी आणि परंपरा जपण्यासाठी अशी वागणूक देणे कितपत योग्य आहे....मी काही आगरकर यांच्यासारखा समाज सुधारक नाही..पण हि घाणेरडी प्रथा बंद व्हावी असा मनापासून वाटत....दागिने/कुंकू हे घरामध्ये कोणत्यातरी महिलेच्या हातून काढले जावेत....

सचिन आचरेकर

Thursday, 29 December 2011

मैत्री

मैत्री टाइमपास म्हणून करायची नसते किवा कोणीतरी कंपनी हवी म्हणून करायची नसते.....
दोन माणसे एकमेकाला भेटतात..बोलणे होते..विचार जूळतात..सहवास वाढतो आणि मैत्री होते.
मुलगा आणि मुलगी ची मैत्री असेल तर ती एक चर्चेचा विषय बनते...
पण मैत्री मधे गरज असते ती एकमेकांवरचा विश्वासाची, एकदुसर्‍याचा भावनांची.
मैत्री मधे एकमेकाचा सुखाचा साथीदार आणि दुखचा भागीदार वायचे असते..
मित्राने प्रामाणिक पाने दिलेले कॉमेंट्स आत्मसात करून आयुषात पुढे जायचे असते.
ब्लडग्रूप ओ + असला तरी लाइफ मधे बी+ राहायचे असते.
मित्रावरती रागवायचे असते पण थोड्या वेळाने परत एक वायचे असते..
कारण मैत्रीचे हे नाते कधीच टाइमपास नसते..ते आयुष्यभर जपायचे असते.

Monday, 19 December 2011

सोशल नेटवर्किंग

सध्या सोशल नेटवर्किंगचा विळखा तरुण पिढी ला लागलेला दिसतो. या विलख्यामध्ये
गुंतणारे जास्तीत जास्त मेम्बर्स हे १८ ते २५ या वयोगटातील असल्याचे आढळून
येते. लोकांना आपल्या आयुष्य पेक्षा दुसर्यांच्या आयुष्यात काय चालला आहे
याचीच जास्त चिंता असते आणि म्हणूनच फेसबुक सारख सोशल नेटवर्किंग ची वेबसाईट
अमेरिकेपेक्षा भारतात जास्त प्रसिद्ध होते कारण अमेरिके सारख्या देशात सोशल
लाइफ फार कमी आहे. सोशल साईट चा वापर चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा करता येतो.
पण सध्याची पिढी एक मुलगी पटवण्याचे साधन म्हणून "फेसबुक" कडे बघतात. chatting
च्या रूपाने flirting चालू होते. आज या मुलीला तर उद्या त्या मुलीला "I Love u
" बोलले कि झाला propose , किती सोप्प आहे ना .... माझा प्रेमाला विरोध नाही
पण केवळ timepass म्हणून एखाद्याच्या भावनांशी खेळणे किती योग्य आहे? काही जण
seriously लग्नाचा विचार करून relationship ला सुरुवात करतात....पण हा विचार
करताना ज्या आई वडिलांनी आपणास जन्म दिला त्यांच्या अपेक्षा काय
आहेत...त्यांना हे आवडेल का? नाही आवडलं तर काय होणार याचा सुद्धा विचार करणे
गरजेचे आहे. Online chat मध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीला किती ओळखता? कि फक्त
chat वर विचार जुळतात असा विचार करणे कि त्याच्या आवडी-निवडी जाणून न घेता
प्रेमात पडणे योग्य आहे?. असे म्हणतात कि प्रेम आंधळे असते त्यामुळे समोरील
व्यक्तीच्या गुणधरमानकडे दुर्लक्ष होतो...आणि लग्न झाल्यावर जेव्हा सहवास
वाढतो तेव्हा नेमके तेच गुणधर्म आडवे येतात...त्यामध्ये तुमचे relation किती
वेळ टिकू शकेल...याचा विचार करणे गरजेचे आहे. काही मुली फक्त गोड बोलून
मुलांचा लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतात आणि propose केल्यावर ignore
करायला सुरुवात करतात.. आपल्यामागे किती मुलगे लागले आहेत ते दर्शवून त्यांना
आपण ग्रेट असल्याचे वाटते पण medical science मध्ये त्याला psychological
disorder समजले जाते.
कमी वयात प्रेम केल्यामुळे तुमच्या carrier वरती परिणाम होवू शकतो आणि
भावनेच्या भरात आयुष्यातील मोठी चुकू होवून कौमार्य गमवून बसू शकता. Medical
science च्या दृष्टीने विचार केला तर या वयामध्ये शरीरामध्ये काही बदल होत
असतात..त्यालाच वयात येणे असे बोलले जाते आणि शरीरात स्त्रवणाऱ्या काही
Harmones मुळे एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू लागते त्यामुळे तुमच्या मनावर
तुम्ही किती कंट्रोल करू शकता याची पण एक कसोटीच असते. maturity यायला थोडा
वेळ लागतो आणि जेव्हा mature व्हाल तेव्हा योग्य ती व्यक्ती तुमच्या
आयुष्यामध्ये नक्कीच येयील.
हा एक साधारण लेख आहे आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाण्याचा प्रश्न नाही.
कोणीही वयक्तिक आपल्यावरती अ लेख ओढवून घेवू नये हि विनंती.
सचिन आचरेकर

Sunday, 18 December 2011

सोशल नेटवर्किंग वेबसाईटस - नाती

सध्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटस मुळे बऱ्याच नवीन ओळखी होत आहेत. त्यामध्ये
काही ग्रुप्स बनत आहेत आणि त्या ग्रुप मध्ये वयातील अंतरामुळे दादा - ताई किवा
काका - मावशी अशी नाती बनत आहेत. सध्याच्या professional जीवनामध्ये खरच अशी
नाती बनवणे योग्य आहे का? कि फक्त मैत्रीचे नाते ठीक आहे? कारण अशा
नात्यांमुळे एक भावनिक ओढ निर्माण होते. मोबाईल, chat , SMS च्या माध्यमातून
संपर्क वाढतो आणि हीच नाती रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त जवळची वाटू लागतात.
त्यातूनच आपल्या सख्या नात्यांकडे दुर्लक्ष सुद्धा होवू शकतो. या नात्यांमुळे
अपेक्षा वाढतात आणि त्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही कि मन दुखावते. रोजच्या
बोलण्याने एक सवय जडून जाते आणि एक दिवस बोलणं नाही झाला तर कुठे मन रमत नाही.
नाती बनवताना आपण हे विसरून जातो कि समोरची व्यक्ती आपल नात किती seriously
घेत. म्हणजे तुम्ही एखाद्याला काका किवा मावशी बोलत असाल तर खरोखरच समोरच्या
व्यक्तीला ते नात आवडत का ? कि आवडत नसेल...समोरच्या व्यक्तीला आवडत असेल तर
ठीक आहे पण ती व्यक्ती या नात्याच्या जाहिरातीने दुखावली तर जात नाही
ना....जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी बहिण - भावाच नात जपतात तेव्हा ते नात
पुढे जावून डोईजड होवू शकते कारण आपली बहिण कुठेच चुकू नये अस प्रत्येक भावाला
वाटत असत... जर ती मुलगी कोणाच्या प्रेमात पडली तर ते कदाचित एक भाऊ या
नात्याने तुम्हाला समजणे जड जावू शकते. मुलीनी एक विचार केलेला असतो कि जेव्हा
लग्न होयील तेव्हा सासरचा नात जपायचं...त्यामुळे जेव्हा अशा बहिणीचा लग्न
होणार तेव्हा या नात्याचा सुद्धा अंत होवू शकतो कारण त्या मुलीच पुढील आयुष्य
हे सासरच्या माणसांवर अवलंबून असत आणि त्यासाठी प्रत्येक मुलीची तयारी
असते...त्यामुळे हा विचार मनात ठेवून जर तुम्ही एखाद्या मुलीला बहिण समजत असाल
तर ठीक आहे नाहीतर जर तुमचे मन sensitive असेल तर मैत्रीचे नात जोडणं हेच
चांगले अस मला वाटत..

कृपया हा लेख कोणीही वैयक्तिक घेवू नका....या लेखाचा आणि कोणत्याही व्यक्तीचा
प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष संबंध नाही आहे.
सचिन आचरेकर

Tuesday, 6 December 2011

माझं घर

एक एक वीट रचुनी घर मी बांधिले...
कुठून आले वादळ कुणास ठावूक...
एवढे मोठे घर कोसळताना मी पहिले...
कसा सावरू मी स्वतःला..हेच मला कळेनासे झाले..


विस्कटलेली एक एक वीट शोधतोय...
पण नवीन रचलेली वीट कोसळतेय...
विटा मजबूत रचायला कुठे कमी पडतोय...
हेच मला कळेनासे झालेय...

मला वाटत त्रुटी त्या विटांमध्ये नाही.
त्रुटी माझ्या कर्तव्यात राहिली...
तुटलेले घर बांधायला मी का कमी पडतोय..
हेच मला कळेनासे झालेय...

जुन्या विटा लवकरच सापडतील
नवीन विटाना साथ देतील..
आपले घर परत उभे राहील...
अगदी पाहिल्यासारखे....

सचिन आचरेकर

तुझा विरह...

फेसबुक वर तिची ओळख झाली
तिचा ऑफिसमधला रिकामा वेळ ती माझ्याशी chat करून घालवू लागली..
मी मात्र वेड्यासारखा माझं काम बाजूला ठेवून तिच्याशी गप्पा मारायला लागलो..
कधी reply नाही दिला तर बोलायची....तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाही....
आणि सारखं piing करत रहायची...
मला वाटायचे ...माझी किती काळजी करते...माझ्यासाठी online येते..

बोलता बोलता..तिच्यावर मन कधी जडले कळलच नाही..
एकदा ती मला म्हणाली...मला एक मुलगा आवडतो...सांग मी काय करू?...
तो मुलगा मी नसणारच हे मनाला माहित होत...
असंख्य विचार मनामध्ये घोळू लागले..
ना कामात लक्ष ना जेवणावर....
ना कोणाशी बोलावेसे वाटत होते...
कोणी online बोलायला आले तर busy आहे अस सांगून शांत बसायचो..
विचार केला...एकदा मनातले सांगून मोकळे व्हायचे...
पण मनातला ऐकून ती मैत्री तर नाही तोडणार ना....
आणि ती नाही बोलली तर माझं दिवस कसा जायील...
असंख्य विचार.....आणि मनाची कासावीस..
पण एकदा तिला सांगूनच टाकले...
अपेक्षेप्रमाणे तिचा नकार आला.....
आता ती मला ignore करतेय...
माझ्याशी बोलणे म्हणजे डोकेदुखी झालीय...
पण मला तिच्यासोबत बोलल्याशिवाय चैन पडत नाही...
ती बोलली..असा कसा विचार करू शकतेस तू...मला फक्त मित्र हवाय...
मी बोललो तुला मित्र हवाय मग आयुष्य भारासाठी का नको...
ती म्हणे सगळ्यांशीच चांगली बोलते आणि सगळेच तिच्या प्रेमात पडतात....
पण असा का वागते...कि ज्याच्यामुळे एखाद्याला सवय होते..इतक्या जवळ का जाते?
कि दूर जाताना त्रास देवून जाते...
मी शांत आहे समजून घेयीन...पण..
माझ्यासारखा एखादा प्रेमवेडा असेल तो कदाचित आपले आयुष्य संपवेल...
तुझ्या विरहाने......

सचिन आचरेकर
06/12/2011

Monday, 5 December 2011

एक चिमणी...

एक चिमणी पिंजऱ्यात बंधिस्त
पिंजरा हेच आपला माहेर आणि सासर समजलेली..
एक चिमणा..रोज तिच्या पिंजर्यासमोर घिरट्या घालणारा..
तिच्या आयुष्याकडे केविलवाण्या नजरेने बघणारा..
रोज तो यायचा...चिमणी पण हर्षाने बघायची..
तो आला... कि चिव चिव करायची...
तो चिमणा स्वच्छंद पणे विहार करायला विसरला...
सगळे सोबती फिरून दाने टिपून घरट्यात परतायचे..
तो मात्र एकाकी...काहीच न खाता परतायचा...

एके दिवशी बोलला तो चिमणीला..
चल माझ्यासोबत...सगळा जग फिरुया...
दोघे मिळून आपल्या घरट्यात राहूया
तुझ्या सोबतीने मला पण विहार करायचाय...

चिमणी बोलली..नाही रे..माझ्या पंखात आता बळ नाही...
माझ्या असण्याने ..इथली लोक बघ किती खुश राहतात..
त्यांच्या ख़ुशी साठी मला असाच रहायचय..

तू आजपासून इथे येवू नकोस...मला विसरून जा..
चिमणी ने स्वतःला strong समजलं..
तो चिमणा दुसऱ्यादिवशी नाही परतला.....
चिमणी विसरून गेली...असेल कुठेतरी खुश या विचाराने...
पण तो चिमणा तिला विसरू शकत नव्हता....
आणि परत पिंज्र्याकडे जावून चिमणीला त्रास होयील म्हणून जात नव्हता..

चीमाण्याने अन्न पाणी काहीच घेतले नाही..
घरट्यातून बाहेर देखील पडला नाही..
आयुष्य जगावे असा त्याला वाटले नाही...
त्यामुळे तो ४ दिवसातच मारून गेला...
इथे चिमणी मात्र खुश होती....
त्या चिमण्याला कोणीतरी दुसरी चिमणी मिळाली असेल या विचाराने...

सचिन आचरेकर.
05-12-2011

Friday, 21 October 2011

मालवणची दिवाळी

इली इली माझ्या घरी इली दिवाळी . ...
फाटफटी उठान धक्क्यार जातलाय ..
जाळूक नरकासुराची होळी ....

घराकडे येवन ....उटणा लावन न्हातलय ....
ओल्या अंगान....कारीट फोडून ....
गोयांदा ...गोयांदा आरडतलय

आवशीन बनयलेलो आणि शकल्याकद्सून इलेलो
फराळ खातालय.......
आजयेन बनयलेले गोड ओले - पोहे रगडतालय

चावदिसा दिवशी चावत रवतलय ...
लाडू , करंजे , चकली आणि शंकरपाळी ...
व्हाळावर धावाचा टाळूसाठी घेतलाय हजामोलाची गोळी ...

पाडव्याच्या दिवशी निघता रामेश्वराची पालखी .
मुलांनी बनवलेले किल्ले बघुक जातव आम्ही सगळे सोबती ...

चार दिवस वाऱ्यावर झुलतलो कंदील
आणि दारावर फुलाताला तोराण .
दिवे जळतले आणि रांगोळीने खुलतला
दारासामोराचा अंगण...

इली इली माझ्या घरी इली दिवाळी . ...
साजरी करुक चाललाय मी उद्या संध्याकाळी.....

सचिन आचरेकर

Thursday, 20 October 2011

समाज ..........

समाज ..........
हाच तो समाज ....

मुलाच्या आणि मुलीच्या मैत्रीला ...
लफड्याचे स्वरूप देणारा .....
... हाच तो समाज ....

मी भारतीय आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रतिज्ञा करून
मुलींची छेड काढणारा ...
हाच तो समाज

जातीयवाद , धर्मियता , चालीरीती, रूढी परंपरा जपण्याच्या नावावर ....
एखाद्या पिदिताचे शोषण करणारा ....
हाच तो समाज

आत्महत्या करणे हा गुन्हा आहे अस सांगणारा
आणि आत्महत्येस प्रवृत्त करणारा ....
हाच तो समाज

जातीनुसार आरक्षणला विरोध करणारा
आणि लग्न जुळवताना पहिली जात विचारणारा
हाच तो समाज

कंटाळा आलाय या समजाचा ....
इछेप्रमाणे जगूही देत नाही...
आणि इछेनुसार मरूही देत नाही ....

पण.........

समाजाला बदलायचे असेल तर
पहिले बदलायला हवे स्वतःला .....
कारण स्वतः कडूनच सुरु होतो तो ...
हाच तो समाज .

सचिन आचरेकर

"आम्ही मालवणी" - टि-शर्ट

कृपया तुमचा नाव, टि-शर्ट सायीझ आणि टि-शर्ट ची संख्या खालील पैकी एका नंबरवरती sms करण्यासाठी, पैसे जमा करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क करा:

समीर गावडे: ९८९२३२७५९९ (Central)
रोशन हिंदळेकर: ९७०२७१०१७९ (Central)
महेश पराडकर: ९८३३८३९८०९ (South Mumbai)
राजन बागवे: ९९८७२२४५१६ (Western mumbai)

टि-शर्ट संबंधी माहिती:
रंग: प्लेन काळा
कॉलर: chinese with grey -whitish border
कापड: smooth nylon निवडलाय म्हणजे लोगो व्यवस्थित दिसेल आणि धुतल्यानंतर रंग जायचा प्रश्न नाही. आणि टि-शर्ट ताणणार नाही.
पुढील बाजू : आम्ही मालवणीचा open लोगो A4 size मधे (चित्रा सारखा दिसेल आणि लोगो चा patch चीकाताव्ल्यासारखा वाटणार नाही.)
पाठीमागची बाजू: "आम्ही मालवणी" हे दोन शब्द आकर्षक font मधे. जिथे आम्ही हा शब्द संपेल त्याच्या खाली मालवणी हा शब्द सुरु होयील.
किंमत: २०० रुपये प्रती टि-शर्ट

जे सभासद मुंबईच्या बाहेर रवतात आणि जेन्का टि-शर्ट हव्या आसा त्यांनी कृपया समीर गावडे (मोबा ९८९२३२७५९९) यांच्याशी संपर्क करा.

नाव-नोंदणी करूची अंतिम तारीख 31st october २०११

सहकार्य करा,
धन्यवाद.

Sunday, 2 October 2011

फेसबुक वरची एक बहीण ....

फेसबुक वर अशीच एका मुलीशी ओळख झाली.
आणि त्याने friend request पाठवून तिला add केली.

सकाळी आल्यावर त्याच्या waal वर good morning लिहायची...
काय दादा.. कसो आसस? असा विचारायची..

सकाळ पासून संध्याकाळपर्यंत chat करायची...
संध्याकाळी जाताना.. उद्या भेटू दादा...सांभाळून जा असा बोलायची...

थोड्या दिवसांनी त्याने तिला आपला mobile number दिला...
सुट्टीच्या दिवशी नक्की फोन कर असा बोलला...

का फोन करायला सांगतोस...कॉन्फिर्म काय करणार
fake account नाही आहे...एवढा विश्वास नाही का बहिणीवर....

नाही रे मी... कोणाला फोन करत...फक्त chat करते.
तुला राग येयिल... पण मी खर सांगते...

अशी काहीतरी कारण द्यायची
आणि फोन चा विषय बाजूला करायची

शेवटी एकदा ठरले...
तू phone नाही केलास तर सोमवार पासून नाही बोलायचे ...
दादा बोलतेस ना...मग खोट-खोट नात का जपायचे.....

ठरल्याप्रमाणे तिचा फोन नाही आला....
तिच्या chat ला त्याने reply द्यायचा थांबवला..

एक आठवडा असाच निघून गेला......
शुक्रवारी तिचा message आला...दादा तुला भेटायचय.....

भेटण्याची जागा आणि वेळ message मधे होती...
ठरल्याप्रमाणे ती एका मुलीसोबत आली होती....

त्याने विचारला hii कशी आहेस..फोन का नाही केलास....
मी वाट बघत होतो तुझ्या फोन ची...मला किती दुखावलास....

तिने काहीतरी हाथवारे केले..ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती...
आणि तो स्थब्ध राहून.....त्याची केविलवाणी नजर तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत
होते ...

तिच्या मैत्रिणीने अनुवाद करून सांगितले...
दादा.....तुझ्याशी खूप बोलावेसे वाटते रे...पण...
म्हणून आज तुला भेटायला आले....

सचिन आचरेकर

Friday, 30 September 2011

एक विचार...

ओ.... बाबा चला ना लवकर... काय पावला मोजत चाललाय...सांगत होतो नको
येवू...तुम्हाला झेपणार नाहीत तरीपण आलात....देवळातली आरती चालू व्हायची वेळ
झाली.. तुम्ही जर असे चाललात तर पोचायच्या आधी संपून जायील...थोडी पावले उचला
आता.....दोघेही देवळात पोचतात पण आरती अर्धी अधिक संपलेली असते आणि मुलगा
वैतागलेला असतो ...दोघेही घरी येतात....मुलगा चीड चीदेपणाने सगळ्यांशी बोलत
असतो.....बाबा शांतपणे घरात जातात आणि कपाटातून एक डायरी आणून एक पान उघडून
मुलाच्या हातात देतात...मुलगा वाचतो आणि ढसा ढसा रडायला लागतो...

आज पप्पू 2 वर्षाचा झाला आणि नेहमी उचलून घ्या म्हणून सांगणारा पहिल्यांदा
देवळा पर्यंत माझ्या हाताचे बोट पकडून चालत आला...त्यामुळे मला देवाची आरती तर
चुकली पण पप्पूला चालताना पाहून खूप समाधान वाटले म्हणून मी येताना दुकानातून
गुलाबजाम घेवून आलो.

सचिन आचरेकर

Thursday, 29 September 2011

एक किस...

पॉर : तू माझ्यावर किती मनापासून प्रेम करतास रे...आजून तगायात माझ्याकडे एक किस सुद्धा नाय मागलास..
पोरगो: तसा काय नाय गो ...तूझ्या तोंडाक वास येता.... वाईच शिरा मार त्या तोंडावर ....मशेरी लायत जा...

दुसरो दिवस:
पॉर: आज कित्याक नाय घेवक किस?
पोरगो: आज तोंडक तंबाखू चो वास येता हा...
पॉर: (वायतागान...) अरे मी रोज कोलगेट लायतंय, पण तुका कोलगेट चो वास येता..आणि तू माका काल मशेरी लावक संगलास म्हणान आज आजयेची तंबाखू ची मशेरी लावन इलय....
तुझी मेल्या नुसती कारण असतात...तुका काय जमाचा नाय मी दुसरो शोधताय..
सचिन आचरेकर

Wednesday, 21 September 2011

आयुष्य...

Dedicated for all members of Amhi Malvani group on facebook.

चार दिवसांचे आयुष्य हे...
सात जन्मानसारखे जगायचे....
हसत खेळत राहायचे...
का उगाच भांडायचे...??

सकाळी उठून...
फेसबुक वर लोगिन व्हायचे...
आम्ही मालवणीचे पेज उघडून...
गजाली मारायचे...

नवे-जुने, मराठा-भंडारी, मुलगे-मुली
असे भेदभाव नाही करायचे
सगळे मालवणी आपण...
मालवणी म्हणूनच राहायचे

कमेंट आणि पोस्ट करताना....
कोणाचे भावना नाही दुखवायचे....
जर दुखावले गेले तर ..
आपापसात मिटवायचे....

एकच कुटुंब आणि एकच परिवार...
भांडणं करून वेगवेगळ्या चुली नाही थाटायचे...
आपल्या विचारांची देवाण-घेवाण करून
रोज काहीतरी नवीन शिकायचे....

मालवणी भाषा, मालवणी संस्कृती
आणि मालवणी विचार आत्मसात करायचे...
मी मालवणी नाही तर आम्ही मालवणी....
एकमेकंका समजून घ्यायचे....

चार दिवसांचे आयुष्य हे...
सात जन्मानसारखे जगायचे....
सचिन आचरेकर

Monday, 12 September 2011

स्पीचलेस....

होता एक वेडा मुलगा
आत्मविश्वास हरवून बसलेला...
सगळ्या मित्रांचा चेष्टा मस्करीचे साधन होऊन राहिलेला...
...
एखादा मुलगी आणि मुलगा प्रेम करताना तो पाहायचा....
आपल्यासाठी कोणीतरी हवे असे त्यालादेखील वाटायचा...

पण मुली त्याला भाव नाही द्यायचे....
त्यामुळे मुलीनसोबत बोलताना त्याच्या तोंडून शब्द नाही फुटायचे.....

एकदा असच एका सुंदर मुलीने त्याला पत्ता विचारला....
पूर्ण गोंधळलेला तो काहीच नाही सांगू शकला....

कदाचित असावा मुका बाहिरा....
असा गैरसमज झाला त्या मुलीचा....

तिला दया वाटायची अपंग लोकांची.....
करायची मदत जशी तिला जमायची....

ती त्याला डॉक्टर कडे घेऊन गेली...
पण डॉक्टरना काहीच सापडले नाही...

ती त्याची काळजी घेत होती......
त्याला बोलायला यावे म्हणून धडपडत होती.....

तिची माया पाहून त्याच्या मनात प्रेम जागे झाले......
बोलायला येऊनसुद्धा त्याने मुकयाचे नाटक चालूच ठेवले...

अशाच एका अपंग माणसाला ती मदत करत होती...
पण तो माणूस अपंग बनून भीक मागत होता....

त्याचे नाटक बाहेर आल्यावर त्याने तिच्याकडून खूप मार खाल्ला होता.....
त्याच्याजागी या वेड्या मुलाने स्वताहाला पहिले होते...

आपल्याबद्दल खरे समजले तर...ती आपल्याला सोडून जाईल.....
या भीतीने त्याचे मन घाबरले होते......

घाबरलेल्या मनाने वेगळाच निर्णय घेतला......
डॉक्टर कडे जाऊन जीभ कापून घ्यायचा....

डॉक्टरनी तसे करण्यास नकार दिला....
आणि फोन करून तिला याबद्दल माहिती दिली...

आरशासमोर उभा राहून त्याने सगळे शब्द उच्चारले....
आई, बाबा, मित्र....आणि तिचे नावही....

घेतला हातात सुरा...आणि कापून टाकली जीभ....
काय वेडेपणा म्हणावा का ह्याला?....की खरे प्रेम.....

डॉक्टरच्या फोन नुसार ती त्याला भेटायला आली...
आणि म्हणाली...मला तुझ्या तोंडून माझे नाव ऐकायचे आहे....

सचिन आचरेकर
(स्टोरी ऑफ "प्यार दीवाना होता है" ...)

Friday, 9 September 2011

पटेल...

ती त्याला आवडायची पण...
तो विचार कारायचा....ती पटेल का?
...

...
थोड्या दिवसानी ती वाटेत भेटली
आणि म्हणाली....
हे मिस्टर पटेल आणि मी मिसेस पटेल.
सचिन आचरेकर

Tuesday, 6 September 2011

एके दिवशी काय झाले.....

एके दिवशी काय झाले....
मी फसेबूक access केले.....
"Page cannot be displyaed" आले

मला वाटले...
माझे नेट कनेक्षन गेले...
पण इतर साइट नीट चालले....
मला काहीच सुचेनसे झाले...
मन माझे.. सैरा वैरा धावू लागले...

ते AM चे मित्र..
त्या कविता आणि चारोले..
सगळे मालवणी मावळे
कुठेतरी हरवले....

TV वरती न्यूज़ मधे सांगितले
आजपासून फसेबूक बंद झाले...
माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले...

ऑफीस ला जाऊन काय करणार...
वेळ कसा घालवणार....
असे असंख्य प्रश्न मनाला पडू लागले...

आज ऑफीस ला नाही जायचे...
आणि छान पैकी घरी झोप काढायची असे ठरवले...

तेवढ्यात आई आली उठवायला...
7 वाजले ...ऑफीस ला नाही का जायचे तुला...

तेव्हा मला कळले....
मी एक भयानक स्वप्न पहिले.....
तयारी करून ऑफीस मधे येऊन...
पहिले फसेबूक वर लोगिन केले....

सचिन आचरेकर

Monday, 5 September 2011

राणीची बाग...

काल सहजच राणीच्या बागेत जावचा ठरवलव....
कोणीतरी सांगल्याण...बागेत आता राम नाय रवलो....
पण सगळे गणपती बघून थोडीशी विश्रांती घेवक गावातली म्हणून गेलव...

तिकीट कसला...बघण्यासारख्या काय नाय हा असा कोनतरी बोलला....
आतमधे ओळखीचो माणूस रवता...तेका भेटूचा कारण सुचला....

बागेत जाताना खाण्याचे पदार्थ आणि पाण्याचे बातले न्हेवक नाय दिल्यानि....
पशु पक्षांका त्रास देशात... ह्या कारण पुढे केल्यानी...

निरनिराळ्या प्राण्यांचे मोठे मोठे पिंजरे होते....
पण त्याच्यावर "दुरुस्ती साठी पिंजरा बंद आहे" अशे बोर्ड होते....

पिंजर्यांवर पक्षांची आणि प्राण्यांची नावा लिवलेली होती.....
पशु पक्षी गायब होते....आणि त्यांच्या नावांची पाटी पण गंजलेली होती...

पिंजरयाच्या आजु बाजुक चिखल झालेलो....
आपणाक कोण बाघूक येना नाय म्हणून सफेद कावलो पण कालो झालेलो....

पिंजरयात....कृत्रिम गुहा बनवलेली....
पण त्यात कोण असा की नाय... ता... शोधत माणसा भायर उभी रवलेलि....


एका पिंजरयात अस्वल निजलेला दिसला...
लोकानि कितीही उठवल्यानी तरी उठानार नाय असो पण करून बसलेला....

दोन पिंजरात वाघ गुहेमधेच झोपलेले होते...
कदाचित ते पण पिंजारो खाली करूच्या दिशेन प्रवास करीत होते...

दोन गेंड्ये आणि चार मगर एकदम शांत.. पाण्यात विसावलेले...
पोपट आणि लवबर्ड चिव चिव करत स्थिरावलेले....

रिकाम्या पिंजर्याआत कोण वाघ दाखय तर कोण कोल्हो दाखवायचो....
आणखीन चार लोक वाकन बघुक लागले की त्या माणसांचो पोपट व्हायचो....

पुढे गेल्यार एक माकड दिसलो....
१ रुपयाची नाणी पावसाच्या पाण्यात धुवत बसलेलो.....

कदाचित तो ह्याच सांगत होतो.....
तुमचो तिकीटाचो पैसो पाण्यात गेलो.....

सचिन आचरेकर

Tuesday, 30 August 2011

एक कप कॉफी...

हॉटेल मधे..
लांबसडक केसांची..
गोरी गोरी छान
मुलगी बसली होती...


चोरून चोरून
माझ्याकडे एकटक
बघून मला नजरेने
घायाळ करत होती

सुंदर रसाल
लालभडक ओठ
थोडेसेच
उघड बंद करत होती...

टपोरी डोळे
मिचकावत होती
गालातल्या गालात
हसत होती...

माझे नशीब
आज खुलले.
मला वाटले...
ती इशारा करत होती...

मी माझ्या
टेबल वरुन उठून..
तिच्या टेबल कडे गेलो.
आणि हलकच हसून उभा राहिलो.

तेवढ्यात तिने...
कानातला हेड फोन काढला..
आणि मला म्हणाली...
एक कप कॉफी प्लीज़...

सचिन आचरेकर

Monday, 29 August 2011

प्रणय...

थंड-गार पावसामधे
बेधुन्द होऊनि न्हावे...

तू माझ्या जवळ यावे
आणि मला मिठीत घ्यावे...

सोज्वळ तुझे तन..
माझ्या स्पर्शाने गरम व्हावे...

डोल्यातील शब्द कळावे....
लज्जेचे बंध गळावे....

श्वास श्वासातून मिसळून जावे...
थंडाव्या तही उबदार वाटावे....

मिटून डोळे..तृप्त न्हावे
तनामनात तूच भिनावे...

स्वर्गसुख अनुभवताना...
सगळ्या जगाला विसरूनी जावे...

हा पावसाळा कधीच न थांबावे....
पावसामुळे ऑफीस बंद रहावे....

तू निघून जाता सकाळी
'नको ना जाऊ' असे रूसावे....

पुन्हा एकदा उराशि तुला कवटाळावे...
आणि तू आठवणींचे चुंबन उशशी ठेवून जावे...

सचिन आचरेकर

Tuesday, 23 August 2011

flirt...

आवाशीन सांगल्यान .
मेल्या २८ वर्षचो झालास
आता घरात सून हाड....

मीया facebook वर लोगिन केलय
धडाधड मुलींका रिक्वेस्ट पाठवलय..
हाय हेलो केलाय...
आणि पटकन लग्नाचा इचारालाय....

सगळिकडून नकार गावलो ही गोष्ट सोडाच....
पण लग्नाबद्दल विचारणा ह्यो काय गुन्हो आसा काय....?

आता सांगा माझा काय चुकाला...?
टाइमपास तर करुक नाय....

सगळीकडे गाजावाजा झालो...
आणि माझ्यासाराखो एक साधो माणूस flirt ठरलो.

सचिन आचरेकर

Monday, 22 August 2011

चला पुन्हा एकदा भारत देश स्वतंत्र करूया...


जनलोकपाल बिलासाठी अण्णाना पाठिंबा देवुया...
भ्रष्टाचाराची दही-हांडी फोडूया...
चला पुन्हा एकदा भारत देश स्वतंत्र करूया...

लाच घेणे हेच्यापेक्षा लाच देणे ह्यो गुन्हो असा...
दुसर्‍याक दोष देवच्या आधी सुरूवात स्वताहा पासून करूया...
कालो पैसो भारतात आणूक धरणा करूया....
वाढलेली महागाई कमी करूया
चला पुन्हा एकदा भारत-देश स्वतंत्र करूया...

अहिंसेची लढाई लढूया....
गोरयांच्य़ा हातातसून देश सोडावल्यानी ...
आता काळ्यांच्या हातातसून मुक्त करूया...
लोकशाही म्हणजे काय... ता दाखवून देवुया....
चला पुन्हा एकदा भारत देश स्वतंत्र करूया...

सचिन आचरेकर

Friday, 5 August 2011

छत्री...

तिची छत्री वादळात मोडली होती...
वाटले तिला आपल्या छत्रीत घ्यावे....
पण घेण्याची हिंमत नाही झाली...
कारण माझ्याही छत्रीला भोके होती....

मी तेच्याकडे बघत होताय...
कदाचित ता माझ्या छत्रीचो आधार घेयत...
पण ता पावसात भिजतच रवला...
दुसर्यदिवशी तपान फडफडला......

ताप इलो म्हणान डॉक्टराकडे गेला...
डॉक्टरकडे सांगल्यान झालो नेमोनिया...
माझ्या छत्रीत इला असता...
तर सर्दि वर निभावला असता.....

तुझी भेट ...

आज लागे मज
आस तुझ्या भेटीची...

मजसाठी एक दिस
सोड कामे शेतीची....

शपथ आहे तुज
तुझ्या माझ्या प्रीतीची...

घेऊ नको धास्ती
तुझ्या म्हातार्‍या बापाची...

भागवू एकमेकास पाहुनी
तहान आसुसलेल्या नयनांची...

ये ना समजून काढाया
माझ्या वेड्या मनाची...

तुझी भेट.....भेट
मज मैत्रीच्या सणाची ...

वाट बघटेय मन..
तू भेटायला येण्याची.....

by सचिन आचरेकर

Monday, 1 August 2011

गिरणी कामगार विशेष...

ओ गाववाल्यानु ऐकलास काय?
मी मुंबईतलो गिरणी कामगार..

गेली २९ वर्षा झगाडतय...
मिल बंद पडले...आणि गावाची वाट धरलय...

म्हटला.. गावकडे भाव बांधकी बरोबर...करीन शेती...
चार पैशे कामावन रवान सुखी...

भावाक वाटला ह्यो हिस्सो मगाक इलो...
तो पण अनोलख्या सर्खो वागाक लागलो...

एका घराचो येगळेचार केल्यान....
भावा-भावाचा नाता तोडल्यान....

माझ्यावाटयाक कमी हिस्सो दिल्याण...
वागीच भांडाणा नको म्हणान माझ्या मनं शांत रवल्याण...

जेव्हा कामक होतय...तेवा माका पत्रा धाडायचो...
दादा कधी यतलास... असा पत्रात लिवायचो....

माका रजा नाय...काम भरपूर आसा...
असा पत्रात लिवताना गावाची खूप आठवणी येयचो..

पण आता काय रवला नाय...
माझ्या हातात ४ पैशे नाय म्हणान कोण माका इचारणा नाय....

खूप केलव् आंदोलना आणि मोर्चे...
तेच्यावर राजकारण्यांनी मिळवलयानी खुर्चे...

आजुनय माझ्या पदरात काय पडाक नाय...
सत्ता मिळावक "मराठी माणूस" पण सोडलयानी नाय...
आता म्हणे... कामगरांका घरा देतले....
काय माहीत....? काय परत.....?
त्याच मुद्द्यावर राजकारण खेळतले??

सचिन आचरेकर

रक्षाबंधन विशेष...

दादा तुका स्वताच्या हातान...
करूचा हा माका रक्षाबंधन...
ये रे दादा...ये रे...लवकर....
येता तुझी खूप खूप आठवण...

गणपती आणि दिवाळी साठी....
तुका होई असता सुट्टी...
एका दिवसासाठी येवचा लागता म्हणान...
तू येनस नाय बांधून घेवक माझी राखी...

दादा मी एकुलती एक बहीण ना तुझी ..
लोक रडतत. ..तेन्का बहीण नाय म्हणून...
थोडेच दिवस मी घरात असतलय...
काय माहीत लगीन झाल्यार खायच्या गावक जातलय...

भावबिजेचा सांगून कारण
राखीशी कशाक रे समझोतो....
भावा बहीनीच्या प्रेमाची..
आठवण म्हणून बांधतत राखिचो रेशमी धागो...

लहान असताना 1 रुपया द्यायचस ओवाळणी.
मी रूसल्यावर सांगायचस....
मोठो झालय काय देईन मोठी ओवाळणी....

माका नको नवीन साडी...
नको तुझी दौलत...
माका फक्त होई आपुलकी आणि तुझी माया थोडी...

ह्या वर्षी मी खूप खुश असाय...
सुट्टीच्या दिवशी आसा रक्षाबंधन...
ये रे दादा...ये रे...लवकर...
वाचत काय बसलास...काढ टिकिट पटकन....

सचिन आचरेकर

Friday, 22 July 2011

गुलाब...

मी सांगलाय गुलाबाक तू माका लय आवडतास...
गुलाब म्हणाला पण माझा प्रेम त्या भुन्ग्या वर होता...

रोज तो माझ्यासाठी घिरटे घालायचो...
माझ्यावर जिवापाड प्रेम करायचो...

सुवासिक वाटनय नाय आता मी तेका..
माझ्यासमोर दुसर्‍या फूलाभोवती घिरटे घालता...

मी सांगलय...तुझ्यासाठी मी भूँगो बनान...
तुका रोज टवटवीत ठेवीन...

गुलाब बोलला..तुका जमात मा ?
माझ्यातले काटे बघून माका सोडूचस नाय मा?

तुझ्यासाठी काटाइयाची वेदना सहन करीन...
तुझ्या साथिन दोघांचा आयुष्य फुलवीन...

ता गुलाब माझा होणार होता...
पण कोणीतरी सांगल्यां मी मोगर्‍याक पण असाच बोललाय...

मोगर्‍याची आणि माझी ती एक गंमत होती...
आता ह्या सांगूक माका वाटता भीती...

मनाशी ठरवलाय त्या गुलाबाक विसरायचा...
खयचातरी दुसरा फूल शोधायचा...

पण हल्ली उमललेलि फुला कोणीतरी चुरागललेलीच वाटतात
कोमल कळ्यांकडे बघून पण तसाच वाटता.....

कधी कधी असा वाटता...भुन्ग्यासारख्या जगायचा....
एका फुला तली मज्जा घेवन दुसरा फूल शोधायचा....

सचिन आचरेकर

आयुष्यचो होउर

न्हदिक इलो होउर
झोपडा गेला व्हावान

आयुष्यभर राबलय
मिळवलेला घालवलाय

भेटान गेले
पोलीस-पाटील आणि सरपंच

केल्यानी पंचनामो
माझ्या आयुष्यचो

नैसर्गिक संकट
म्हणून सरकारची मदत

पण पोचाची नाय माझ्यातगत..
आयुष्य काढायचा कसातरी जगत...

अशेच होउर येतले.
आमचे संसार व्हावान जातले

उरलेला सुरलेला
मदत मिळवूक चाय-पाण्याक जातले

आणि तेन्का पैशे कमवक
संधी देवन जातले..

-सचिन आचरेकर

याक सपान ...

आज याक सपान पडला...
सपनात एक म्हातारी रडत होती...

कसो आसास झिला..कामधन्दो बरो चललो हा..
असा इचारात होती...

कोण तू आजये.. मिया ओळखालाय नाय तुका...
कसो ओळखाशित झिला तू माका...

आवस तुका मारी तेव्हा मीच काढून घ्यायचाय..
बापूस कर्वदलो काय बापाशीक मीच बोलायचाय ..

तुझे चुके माझ्या पदरात घालायचाय..
माझा लेकरू अजुन लहान हा, तेका अक्कल नाय इली हा असा सांगायचाय ...

चोरून कोंबडेचा काळीज तुझ्यासाठी काढून ठेवायचाय...
तू लय मोठो होवाचस म्हणून गणपातिक गार्हाना घालायचाय...

ह्या सांगताना तिचे कोरडे डोळे ओलवत होते...
माझ्या डोक्यार ठेवलेलो हात थरथरत होते...

तू आता लय मोठो झालस..
माझ्यासकट सगळ्या गावाक इसारलस...

आता तुका माझी चौकशी करुक टाइम खय गावता..
तुझ्या पूजेची गणपती पण वाट बघता...

गावातली अक्का, माई आमका सोडून गेली...
माझे पण लय दिवस नाय रव्हलेत...

मी जावच्या आधी तुका बघूचो हा...
येळ काढून एकदातरी माका बघून जा...

सपनातसून ताडकन जागो झालाय ...
घड्यालात बघलय तर ३:१३ वाजले होते....
सुट्टी काढून गावक जावचा ठरवलाय...

सकाळीच गावातसून फोन इलो...
तुझी आजी आमका सोडून गेली...

ऐकान हातातलो मोबाइल खाली पडलो...
आठवणींन जीव भसा भसा रडलो...

सचिन आचरेकर

Wednesday, 20 July 2011

लफडा.....

गावातला लफडा सावरून पकलो मुंबइक इलो....
भांडुप मधे चाळीत रवाक लागलो...

पयला लफडा अंगाशी इला....
परत लफड्यात पडायचा नाय असा तेनी ठरायला...

चार दिवसातच समोरच्या खोल्येतला पॉर लायन देवक लागला...
पकल्या चा मन हळू हळू परत लफड्यात गुन्ताक लागला....


ता भांडी घासुक इला काय पकलो कपडे धुवुक जायचो
2 कपडे धुवुक अर्धो तास लावायचो...

दोघांनी एकमेकांका मोबाइल नंबर दिल्यनि....
पुन्हा एकदा नवीन प्रेमाची (लफड्याची) सुरूवात केल्यानी...

रात्री उशिरा पर्यंत एसएमएस - एसएमएस खेळायचे...
"मिस यू" न सुरूवात करून "किस यू" वर थांबायचे....

सकाळी पाण्याच्या लायनीत दोघायले भेटायचे....
एकमेकाक भेटतगायत आपापलो नंबर सोडायचे...

हळू हळू लाफडा सगळ्या चाळीत समाजाला.....
चेडवाचो बापूस दांडो घेवन येयत ह्या भितीन पकल्यचा मन बिथारला.....


ह्या लफडा, लफडा म्हणून नाय अमर करायचा, असा दोघांनी ठरायलयानी
बान्द्रा कोर्ट मधे जावन रिजिस्टर लगीन केल्यानी...


इचार केलास तर पाकळ्यचो शॉर्टकट बरो होतो...
नयतर अशा महागाईच्या दुनियेत ह्या चेडवांचे अपेक्षा पुरे करिपर्यंत बिचारो आयुष्यभर ब्रह्मचारी रवलो असतो...

-- सचिन आचरेकर

Monday, 18 July 2011

एंटरटेनमेंट के लिये कूच भी करेगा...

मुलगी: जानु......तू मला फिरायला घेऊन जातोस, सिनिमा ला घेऊन जातोस, ऑटो, जेवण आणि नाश्ता चे बिल पण तूच देतोस...सांग ना मला तू एवढे माझ्यासाठी का करतोस?


मुलगा: "एंटरटेनमेंट के लिये कूच भी करेगा..."
----सचिन आचरेकर

Wednesday, 29 June 2011

कधी...

गर्भाशायाच्या गुहेमध्ये एक छोटासा जीव हसला....

छोटे छोटे हात पाय पसरून..छोट्या छोट्या ओठानी परत हसला...



विचार करत होती मी बाहेर कधी येयीन..

जिच्यामधे मी रवतय तीका आई कधी म्हनिन..



कधी पाप्पान सोबत आंगणेवाडिक जाईन..

आजोबा सोबत कधी खेळान आजिचे गोष्टी कधी ऐकान

मोठे होवन कधी आईक घरकमात मदत करीन..



आम्ही मालवणी वरती माका भाऊ बहीण गावतीत.

लय भारी पोस्ट करून सगळ्यांचा मन जिंकीन..

मुलगी असलाय म्हणून काय झला..

काम असा करीन माझ्या सिंधुदुर्गचा नाव रोशन करीन.



पण.....पण......पण.....

ह्या काय ऐकून माझा छोटासा हृदय थारथारक लागला..

आई चा काळीज कसा कठोर झाला...पप्पानका कसाच काय नाय वाटला..

माझ्या आयुष्याचा फूल फुलाचाच आधी बावला...

माझ्या "कधी" चा अनपेक्षित अंत झला..



जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ह्याचा विचार करा..

आणि १००० पुरुषांचा मागे १००० महिला होय द्या.



--सचिन आचरेकर

Tuesday, 28 June 2011

सिगरेटचो खोको...

बाळगो आपल्या बायकोक घेवन आपल्या मित्राच्या झिलाच्या वाढदिवासाक जाता..
एक क्वॉर्टर आणि सिगरेट मारता आणि सिगरेट चा पाकीट खिशात ठेवता...
बायको: ओ तुम्ही दारू पिलास काय?
बाळगो: नाय गो कायतरीच काय ? हाय काय मे दारू पिवक ईलाय?
बायको: ठीक आसा...चुकला माझा....वाइच तुमचो मोबाइल देवा...
बाळगो: ह्यो घे मोबाइल...कमीच बोल...बॅलेन्स नाय हा!!!
बायको: ह्या काय???? ओ सिगरेटचो खोको दिलास !!!!!!!!!!!!!!!!
-सचिन आचरेकर
:)

नवरा

एक मुलगी सगळ्याना अहो -जाओ करत असते

ती एका लग्न झालेल्या मैत्रिनिला भेटते
आणि तिला विचारते..
तुझे नवरे कसे आहेत??
ती मुलगी सांगते..............माझा एकाच नवरा आहे...17 नाहीत.
---------सचिन आचरेकर

Wednesday, 22 June 2011

कासारटाको...

पावसाचे सरी लागले की...सगळयांचे नजरो कासारटाक्या कडे वळतात....
पाणी इला काय रे असा सगळे एकमेकाक इचारतात...

माझो कोम्बो देवचो असा म्हादगो पकल्याक सांगता....
पकलो मग सगळ्या गावाक गोळा करता....

फाटफटी आरडनारो कोम्बो फाट्ये खालीच असता...
आज आपलो बळी जातलो म्हणान तो पण थंड असता....

लाकडपासून मिठा पर्यंत सगळी तयारी करतत...
नेमकी..चिकन ढवळूक डावुल न्हेवक इसारतत....

देवक पाया पाडन...कोंब्यचो बळी देतत...
एक नवस फेडतत...आणि परत फुडल्या येळेसाठी दुसरो नवस करतत...

रोज बायलेच्या हातचा आयता चिकन खातत...
पण हयसर सगळे मिळान चिकन बनवतत...

चिकन लय झास झाला असा एकमेकाक सांगतत....
सोबत दारूचो एक घोट मारतत....

दारूची सोय बायलेक न कळता...प्रत्येकजण करता...
देवासाठी दारू पिलय असा कधी न पिनारो पण सांगता...

आजु बाजुक पार्टी चालू असतात....
पण सगळे अगदी बिनधास्त असतात...
ओळखीचो कोण गावलो तरी भीती नसता...
कारण तेनी पण दोन घोट मारलेलीच असता..

धाबदब्यात न्हावन दारू पिवाचि मज्जा काय औरच आसा...
वॉटर पार्क मधे कितीव डूबलास तरी कासारटाक्या सारखी मज्जा खयच नाय आसा....

--सचिन आचरेकर

देवबाग

जेव्हा रात्री मुसळधार पाऊस पडत असता....
सगळे जन मस्त थंडा व्याक पांघरूण घेवन निजलेले असतात.....
तेव्हा आमची एक नजर नदीच्या पाण्याकडे
आणि दुसरी नजर समुद्राच्या लाटांकडे असता......

पावसाच्या कहारान आमचे माड उन्मलान पडतत....
घरचा छप्पर आंब्याचे फांद्ये पडान मोडता....
तेव्हा मदत करुक गावकरी धावता...
एकमेकाचा घर आणि संसार गावातले लोक सावरतत
सगलो गाव एक कुटुंब म्हणान रवतत....

ना शेती ना गुरा ढोरा....ना लाल माती...
ह्या गावात फक्त रूपेरी वळू...आणि माश्याचि आमटी...
नदी आणि समुद्रान वेढलेलो देवबाग ह्यो गाव...
हयल्या लोकांका आणि निसर्गसौंदर्याक कधी इसराक जावचा नाय.

--सचिन आचरेकर

Wednesday, 8 June 2011

रामदेवबाबा.....

स्विस बँकेत जमा आसा कालो मनी..
हे राजकारणी आसत तेचे धनी...
स्विस बँकेतलो पैसो भारतात आणूक...
रामदेवबाबा गराजले...
सरकारचा होणारा वस्त्रहरण सावरूक...
राजकारणी लोकशाही इसारले...
--------सचिन आचरेकर

Monday, 9 May 2011

Happy Mothers Day

अविवाहित मुलगा एका अविवाहित मुलीला: "Happy Mothers Day"
मुलगी: मुर्खा माझे अजुन लग्न पण नाही झालेय.
मुलगा: मग काय लग्न झाल्यावर होशीलाच ना आई, Advance मधे wish केले.
मुलगी: हो का? तुला पण "Happy Fathers Day", Advance मधे.
मुलगा: चल मग दोघे लग्न करूया आणि पुढल्या वर्षी दोन्ही डे साजरे करायला सज्ज
होवुया..

अपवाद

मुलिन बद्डल कधि लिहिले तर...
"सर्वच मूली तश्या नसतात, कही अपवाद पन असतात"
असे म्हनून या मूली स्वतहाला अपवाद मधे मोजतात.

मूलगे मात्र हक्काने संगतात...
सगळे मूलगे अशेच असतात आनी मी पन असाच आहे.
तुला आहे तसा स्वीकारायचा आहे तर 'हो' म्हन नाहीतर गेलिस उड़त.

Exam

Exam चा रिज़ल्ट लगलेला असतो.
एका मूलीला ३ विचयत KT लगलेली असते तर तिचि मैत्रिन पास झलेली असते.
एक मुलगा ५ विषायात फैल झलेला असतो तर त्याचा मित्र पास झलेला असतो.
नापास झलेली मुलगी रडात असते तर नापास झलेला मुलगा हसत असतो.

दोघना कारण विचारले तर..
मुलगी: मला याचे दुख नही की मी नापास झाली. माझी मैत्रिन पास झाली आनी मी नापास
म्हनून जास्त दुःख झाले.
मुलगा: मी नापास झालो तरी माझा मित्र पास झाले म्हनजे आज बियर पार्टी मिलनार
म्हनून मी खुश आहे.

तात्पर्य: मूली कितीही जीवलग मैत्रीणी असलया तरी एकमेकावर जलत असतात, मुलगे
मात्र मित्राच्या यशामधे अपले सुख शोधतात

Tuesday, 3 May 2011

लादेन विशेष...

लादेन विशेष...

त्याला जन्माला मिळाले राजघराण...
अर्थशास्त्र, सिव्हील इंजिनियरिंग,..
बिज़नेस आड्मिनिस्ट्रेशन,..
पब्लिक आड्मिनिस्ट्रेशन...
या विषयात घेतले पदवी शिक्षण...
धर्मावर केले रसग्रहण...
जिहाद आणि कुराण...
यावर देऊन झाले व्याख्यान...
एक होता शौक कविता रचण...
अमेरिका आणि देश इतर बिगर मुसलमान...
ते बनले त्याचे दुश्मन...
११ सप्टेबर २००१ ला...
केले अमरिकेवर आक्रमण....
संपूर्ण जगाला सोडले हादरवून....
तेव्हापासून अमेरिकेच सुरू झालं त्याला शोधण...
आश्रयस्थान मिळाले होते..पाकिस्तान...
दुनियभर गट स्थापून..
१०० लादेन केले हो निर्माण...
जवळ आले होते त्याचे मरण...
बाकी होते..१ मे हा दिन उजाडान...
व्हावे हिटलर चे स्मरण...
तोच त्याचा पण मरणाचा दिन....
गुप्तहेर कडून माहिती मिळवुन
धावले अमेरिकी सैन्य....
घातले तयाला कंठस्थान....
ठार झाला हो लादेन....
१०० आपल्यासारखे बाकी ठेवून..
तो गेला यमसदन...
संपेल का आता दहशतवाद...
की फैलावेल आणखी हो जिहाद...
हा अजूनही अनूत्तरीत एक प्रश्न...

----------सचिन आचरेकर

Tuesday, 26 April 2011

मुलगे मुलींच्या मागे का लागतात...??

सगळ्या मुली अश्या नसतात हे अगोदरच मान्य करून....

मुलगे मुलींच्या मागे का लागतात...??

अरे या मुलीच मुलांना मागे लावतात...
अंगावर तोकडे कपडे घालतात..
ओठाणवर लाल भडक लिपस्टिक लावतात..
थोबाडावर पीठसारखी पावडर थापतात...
आणि मुलांनाच विचारतात...
मुलगे मुलींच्या मागे का लागतात...??

मुलींवर अत्याच्यार होतो म्हणतात...
मग..अत्याच्यर वायला ह्या कोपच्यात का जातात...??

सगळ्या गोष्टीना मुलांना जबाबदार धरतात...
मग मुलांना तसे करायला उत्तेजित का करतात...??

एकीकडे स्त्री पुरूष समानता कायदा मागतात...
मग नोकर्‍यांमधे 50% आरक्षण का मागतात...??

मुलांच्याच पैशात सिनेमा बघतात...
खा खा खातात..पी पी पितात...
बिल मात्र मुलांच्याच गळ्यात मारतात...
आणि मुलांनाच विचारतात...
मुलगे मुलींच्या मागे का लागतात...??

अरे या मुलीच चावट असतात...
पैसेवाला मुलगा बघून टाइमपास करतात...
एकाकडचे पैसे संपले की दुसरा पकडतात
आणि मुलांनाच विचारतात...
मुलगे मुलींच्या मागे का लागतात..??

Thursday, 21 April 2011

सूर्यफुल...

सूर्यफुल...

रोज ते सूर्यफुल सूर्याकडे बघायचे..
सूर्यासोबत आपली दिशा बदलायचे...

काळ्या ढगात सूर्य लपला..
की ते पण रूसायाचे..

सूर्याकडे बघून सगळेच डोळे मिटतात..
पण सूर्यफुल नजरेला नजर द्यायचे..
सूर्याची कीराणे अंगावर झेलायचे..
आणि सुखद भावनानी..फुलायचे...

एक दिवस सुर्या उगवला...
पण त्याला सूर्यफुल नाही दिसले..
सूर्याच्या किरणानी पण फुलला शोधले....

शेताताले ते सूर्यफुल नेले होते माणसाने...
तेलाच्या घाण्यात...तेल बनवण्यासाठी...
सूर्य मात्र रडत होता त्या फुलासाठी....

सॉरी मित्रानू...

सॉरी मित्रानू...
काही दिवस आणि काही करणं मुळे फसेबूक सोडाव लागतय...
तुमच्या सारख्या मित्रणा दूर लोटाव लागतय...

सॉरी मित्रानू...
"आम्ही मालवणी" ची खूप सवय झालीय...
सवय सोडून जगणे..अगदी जिवावर आलाय...

सॉरी मित्रानू...
सकाळी चहा पिताना, दुपार-रात्री जेवताना...
तुमका बोलावल्याशिवाय जेवायचाय नाय...

सॉरी मित्रानू...
उद्यापासून तुमका बोलावचय नाय...
उठलास काय, जेवलास काय इचारूचय नाय...

सॉरी मित्रानू...
माझा फेक्बूक सोडून जाणा मनावर नको घेव...
सांगून जाताय...लवकरच भेटान 'बाय!!!!'...

सॉरी मित्रानू...

माझे मन

माझे मन म्हणाले मला...
हल्ली तू माझे ऐकत नाहीस...
तुझ्या बुद्धी पुढे माझे काही चालत नाही...

पहिल्यांदा तू माझे ऐकायचास...
माझ्यासाठी आईचे धपाटे खायचास...

आता तू मोठा झालास...
आणि मला विसरलास...
बुद्धी स्त्रीलिंगी आहे...
म्हणून निसर्गाच्या नियमानुसार...
माझ्यापेक्षा आता तुला ती मोठी आहे...

Tuesday, 19 April 2011

"जैतापूर प्रकल्प"

"जैतापूर प्रकल्प" हे शब्द एका वृद्ध महिलेच्या कानावर पडले.
तिच्या मनात काय विचार आले असतील ते मांडण्याचा एक प्रयत्न...

अरेय ह्या काय चालला हा...
माका कोणी सांगात काय....

कसलो ह्यो अणूउर्जा प्रकल्प...
माका पण काळात काय....

कसलो विरोध...आणि कसले सभा..
कोकणाशिवाय काय खय नाय जागा....


काल झालो बेधुन्द गोळीबार..
तेच्यात शहीद झालो आमचो एक पोर...

नको रे करू प्रकल्पाचा राजकारण....
नको आणूस आमच्यार उपासमारिचा मरण....

शेतीची जागा प्रकल्पक दिलाव...
तर आम्ही काय खातलव....
आणि कशे जगतलव...

Thursday, 14 April 2011

"जय भीम"

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पेशल...

"जय भीम"

तुम्हाला माझे मनापासून मानवंदन..
तुम्ही समाजाला उत्क्रान्त करणारा दीपस्तम्भ...
भारताची राज्यघटना लिहिणारे भारतरत्न...
समाजाला अभ्यासायला लावणारा तुमचा बुद्धान विषयीचा दृष्टिकोन...
अभ्यासले तुम्ही ऋग्वेद आणि इतर बरेच धर्म..
शोधूनी काढीला क्षुद्र हा चौथा वर्ण...
क्षुद्र समाजाला जगण्या साठीचे तुमचे प्रयत्न...
आणि त्याला जतीनुसार आरक्षण...
पण त्या आरक्षणवर सध्या खेळले जातेय राजकारण...
घटनेत बदल व्हायला करावे लागेल उपोषण...
या समाजाला आर्यांची आणि बुद्धांची परत द्या शिकवण...
आजही तुमची आम्हाला येतेय आठवण..
म्हणून म्हणतो तुम्ही परत घ्या जन्म...परत घ्या जन्म...

--------------सचिन आचरेकर

Wednesday, 13 April 2011

गर्लफ्रेंड...

गर्लफ्रेंड By Sachin Acharekar

असच आपल मनातले सांगायचे होते तीला..
पन छाती धड़धड़ाइची..पाउले तितेच थाम्बयची...
जीभ थरथरयची आनी वेगळेच बोलुन जाइल तर भिति वाटायची....

असच आपल मनातले सांगायचे होते तीला..
पन तिच्या भावनाना दुखवायचे नवहते मला..
प्रेमासाथी मैत्री तोड़ायची नव्हति मला...

असच आपल मनातले सांगायचे होते तीला..
होकर किवा नकार खिलादूपने स्वीकारायचे ठरवले...
असच आपल मनातले मनापसुन सानगायचे ठरवले..

मी विचारले माझी गर्लफ्रेंड होशील??
ती म्हनालि. आज आसा का विचार तोस?
मी तर तुझी गर्लफ्रेंड कधि पासुनच आहे...

मी पन विचारले कधिपसुन??
ती म्हनालि...जेव्हा आपली फ्रेंडशिप झाली तेव्हपसुन..

मला वाटले...........
ती पन असच अपला मानताले आज माला सान्ग्तेय..
ती म्हनालि. माझ लग्न ठरलेय राजू शी..
तू येशिल ना नक्की...
तू एकच माझा Boyfriend आहेस बाकी सगळे Girlfriends आहेत...

मी पन आश्चर्याने विचारले...
किति गर्लफ्रेंड्स आहेत तुला??...
ती म्हनालि..
मैत्रीणी खूप आहेत रे मला...
पन मित्र तू एकटाच आहेस..

----- सचिन आचारेकर

"त्रेतायुग - कलियुग"

रामनवमी स्पेशल by सचिन आचरेकर

"त्रेतायुग - कलियुग"

त्या वेळचो काळ एगलो होतो नाय....
एकापेक्षा जास्त बायका करुक परवानगी होती..
पण प्रभू राम एकपात्नि रवले..

आणि आत्ताच्या काळात..
एकपात्नि चो कायदो असताना...
घरवाली असली तरी बाहरवाली होई असता...

सीता लंकेत रामाच्या नामस्मरणाने निर्धारान रवलि..
वनवासात रामासोबत येवचो हट्ट धरल्याण...
पातीविरह पेक्षा प्राणत्याग स्वीकारूचो ठरायल्याण....

आणि आत्ताच्या काळात...
नवरो गेलो तारवर आणि बायको रवली गुरुवार!!!!!!

पापी वालीचो वध करून..
"किशिंधा कोसळ" आपल्या देशाक न जोडता..
वानर राज शुद्रिवलाच अभिषिक्त केलात...

आणि आत्ताच्या काळात...
मुंबई महाराष्ट्राची की भारताची हेच्यार भांडणा होतात...

कैकेईच्या वरानुसार 14 वर्षे वनवास सोसलत...
भरतान पण तुमचे पदुका सिंहासनावर पुजून..
तुमचो प्रतिनिधी म्हणून राज्य केल्यान...
बंधू प्रेम आणि आई वडिलांची आज्ञा तुम्ही पाळलात.

आणि आत्ताच्या काळात...
आई वडिलांच्या सम्पति वरच्या हिस्शासाठी भावा भावात कोर्टात केशी चालतत.

रावणाचो वध करून फक्त सिते क प्राप्त करून घेतलास...
लंकेच्या राज पदी भीभिषानाकच बसयलात...
दुसर्‍याची भुमी, दुसर्‍याची सत्ता, समर्थ्या असताना पण नकारलात...

आणि आत्ताच्या काळात...
काश्मीर साठी हिंसाचार आणि लढाये घडतात...

राम तुमचो जन्मदिवस आम्ही रामनवमी म्हणून साजारो करतव....
पण तुमचो आदर्श घेवण आमच्या अंतरी रामजन्म घेवक मात्र आम्ही इसारतव...

-सचिन आचरेकर

Friday, 8 April 2011

मित्राबद्दल झालेलो गैरसमज

ही कविता माझ्या एका खास मित्राच्या जीवनाशी निगडीत आसा आणि माझो मित्राबद्दल झालेलो गैरसमज मी मांडूचो प्रयत्न
करतय...


मी माझ्या मित्राला याहू वरती मेल पाठवायचो...
लगेच त्याचा आलेला रिप्लाइ पाहून मी पण सुखवायचो...


[थोड्याच दिवसात......]
मी मेल्स करतच होतो...
पण रिप्लाइ काही येत नव्हता...

काय झालेय ते काही कळेना...
कॉंटॅक्ट करायला मोबाइल पण लागेना...

त्याच्या अशा वागण्याने माझे मन दुखावले होते...
समोर आला की जाब विचारायचे असे मी ठरवले होते...

असाच तो एक वर्षानंतर..फसेबूक वर भेटला...
मी विचारले काय रे मेल्स ना रिप्लाइ देत नाहीस...तू मला विसरला...

त्याचा रिप्लाइ आला...
मी याहू मेल्स ओपन केले की डोळ्यात पाणी येते...
मी मार्मिकपणे विचारले..याहू वर कापून ठेवलेयत का कांदे...

तो म्हणाला..
याहू च्या मेलबॉक्स मधे तिचे मेल्स आहेत..
ती सोडून गेली मला..ब्रेकअप करून..
तिचे नाव दिसले की तिच्या आठवणीने मन जाते भरून...

हे वाचून माझे पण मन गेले भरून...
मी अलगतच आसु पुसले स्वतःला सावरून...

---------------- सचिन आचरेकर

अण्णा स्पेशल....

अण्णा स्पेशल....

अण्णा तुमचो जयजयकार...
तुम्हीच दिलास आमका माहितीचो अधिकार...
मुळापासून निपटून काढूचो भ्रष्टाचार...
ह्यो तुमचो निर्धार...
तेच्यासाठी चालू केलास परत उपासमार..
तुम्ही कसलोच करू नको विचार...
तुमच्या पायावर लोळान घालतला...
ह्या आपला सरकार...
माझो तुमका सास्ष्टान्ग नमस्कार...

जय हिंद -- सचिन आचरेकर

वस्त्रहरण ......

वस्त्रहरण ..............

तिला फक्त प्रसिद्धी हवी होती...
त्यासाठी वर्ल्ड कप ची फाइनल याच्यापेक्षा दुसरी संधी कोणती होती...

केले तिने ऐलान..विवस्त्र होऊन मैदानाला फेरी मारण्याचे...
मीडीयाला मिळाला एक प्रॉजेक्ट..काहीतरी नवीन दाखवायचे...

जिला मूठभर लोका ओळखत होती...तिला दुनिया ओळखू लागली..
प्रसिद्धी साठी तिने प्रतिष्ठा चव्हात्या वर आणली...

द्रौपदीच्या दरबारातील वस्त्राहारणाने महाभारताचा इतिहास घडला..
28 वर्षा नंतर वर्ल्डकप चा पुन्हा इतिहास घडवण्यासाठी तिने वस्त्रहरनाचा मार्ग निवडला...

या देशात दुष्यासनाशिवाय तिला वस्त्राहारण करण्याची कुठून प्रेरणा मिळाली...
प्रसिद्ध व्हायच्या वेडात ती भारतीय संस्कृतीची अब्रू काढून गेली...

-------------------सचिन आचरेकर

मुलगी कधी वयात आली कळलच नाही....

मुलगी कधी वयात आली कळलच नाही....
जन्माला आली तेव्हा पासून लाडकी झाली...


शाळेत असताना पालक सभेला तिला बापच लागायचा...
बाप पण वेळात वेळ काढून हजर राहायचा...


बापाचे आवडताते उकडीचे मोदक आवरजुन बनवायची...
रोज सकाळी उठल्यावर न चुकता चहा बनवून द्यायची..

तिच्या आवडी निवडी बाप पण जपायचा..
तिचे हट्ट पुरवण्यासाठी वेगळे पैसे साठवायचा...
आपली मुलगी म्हणजे त्याला हृदयाचा तुकडा वाटायचा...


मुलगी आता मोठी झाली दुसर्‍याच्या घरी जाणार..
शोधनार मी तिच्यासाठी सुंदर राजकुमार...
असे सारखे म्हणायचा....


मुलगी मात्र आपले हृदय एका पर जातीतल्या गरीब मुलाला देऊन बसली होती...
बाबाना कसे सांगायचे या विचाराने ती खचली होती...

न सांगताच ती एक दिवस त्याच्या सोबत पळून गेली..
जाताना मात्र बपाच्या हृदयात ठिणगी पेटवून गेली.

आपला हृदयाचा तुकडा आपल्याला दुखवून गेला...
हे समजल्यावर त्याला हृदय विकराचा झटका आला...
दवाखान्यात नेताना वाटेतच तो जग सोडून गेला...

एकदा जरी तिने आपल्या मनातले सांगितले असते...
बापाने आनंदाने तिचे लग्न करून दिले असते...
कारण तिच्या सुखाशिवाय त्यालाही दुसरे काय हवे होते...

मुलगी कधी वयात आली कळलच नाही....
बपाच्या प्रेमाची जागा त्याने कधी घेतली कळलच नाही...

------------------सचिन आचरेकर

Friday, 1 April 2011

भारत X पाकिस्तान

भारत X पाकिस्तान चा क्रिकेट सामना...

काश्मीर चा वाद मिटवण्यासाठी..
भारत X पाकिस्तान चा क्रिकेट सामना खेळवावा...
जो जिंकेल त्याचे काश्मीर..

जवानांच्या आयुष्याशी खेळण्यापेक्षा..
क्रिकेट खेळलेले काय वाईट ???
-- सचिन आचरेकर

वर्ल्ड कप स्पेशल....

वर्ल्ड कप स्पेशल....

भारताने पाकिस्तानला धूळ चारली..
सगळ्या भारतात दिवाळी साजरी झाली..

मोहालीची पुनरावृत्ती मुंबईत होऊदे..
आफ्रिदी सारखे संगकाराला पण खाली हात जाउदे..

सचिनला भारत रत्न कधीही मिळूदे..
वर्ल्ड कप च्या स्वरुपात भारताला रत्न मिळूदे..

सचिन चे महशतक त्याच्याच जन्मभुमीत झळकुदे..
९६ च्या सेमी फाइनल चा वचपा निघुदे...


भारतीयांच्या डोळ्यान आनंदाश्रु वाहूदे..
पुन्हा एकदा भारतात दिवाळी साजरी होऊदे..


पुन्हा एकदा घडवा 1983 चा इतिहास ...
तमाम भारतीयांच्या मनात एकच ध्यास...

वर्ड कप वर भारताचा हक़क़ ही आमची इछा..
फाइनल साठी भारतीया संघाला मालवणी शुभेच्छा.

------सचिन आचरेकर

Thursday, 31 March 2011

एक तृतीयपन्थि ...

एक तृतीयपन्थि ...

एका घरात मुलगो जन्माला इलो..
सगळीकडे गाजावाजा झालो...

मुलचो आवुस आणि बापूस खुश झालो
वंशाचो डिओ उदयाक इलो.

लय दबाजात बारसो झालो..
गोरो गोमतो पोरगो पाळण्यात हसलो.

बापूस म्हणे झीलाक इंजिनियर करतलय...
सगळी संपत्ती नावार करतलय.

सगळे नातेवाईक भरपूर लाड करीत..
येणारे सगळे वाढदिवस साजरे करीत..

वय वाढता वाढता..
तेच्या शरीरात अचानक बदल जावक लागला..
चालणा बोलणा बायका सारख्या वाटाक लागला.

आवाशी बापाशीन डॉक्टराक दाखायल्याण...
डॉक्टराण टेका तृतीयपन्थि ठरायल्याण...

समाज नाव ठेवलतो म्हणान...
आवाशी बापाशीन..एका संस्थेकडे सोपयल्याण..
घर सोडून जाताना तेच्या मनान हम्बरडो फोडल्याण....

संस्थेंन रवाची सोय केल्यानी..
तेच्याच सारखे 4 जोडीदार दिल्यनि..

ट्रॅफिक सिग्नल ही कर्मभूमी झाली.
लोकांकाड्सून इज्जत मिळेणासी झाली.

तेंच्याच समाजात तो जगाक लागलो.
घर आणि नातेवाईक सगळा इसरलो.

असोच एकदा सिग्नलवर अपघात झालो.
अपघातात तो ठार झालो.

तेच्या प्रेताकय कोणी नाय रडल्यानि..
पुढल्या जन्मी असो नको जन्म
म्हणान चप्पल्यानी मारीत पोचायल्यानी..

जगताना छ्क्को होतो म्हणान इज्जत नाय..
आणि मेल्यावर परत छ्क्को नको जन्म म्हणान इज्ज्जत नाय..

ह्या समजाचो अजीब नियम आसा...
ह्या दुनियेत खरोखर...
सगळ्याणका इज्जतिन जगाचा स्वातंत्र्य आसा?

------------- सचिन आचरेकर

नियती...

सकाळी उठल्यापासून तो एप्रिल फूल करी होतो...
आवस, बापूस, आजी, बहीण सगळ्याणका फसय होतो...

आवाशीन रागताच म्हटल्याण..जा मेल्या मर जा..खयतरि..
सतव नकोस माका..
जेवण करूचा रवला हा...दुपार झाली तरी..

मित्रंका एप्रिल फूल करुक बाइक वरसून स्वारी निघाली...
तो मित्रांकडे पोचाच आधीच तेंच्या कानावर बातमी पडली...
कोणीतरी एप्रिल फूल करता हा अशी मनात शंका इली...
गावभर तीच चर्चा सुरू झाली...

आवशी-बापाशिक सांगुची कोणाक हिंमत होय नाय...
कायटरी गावात अघटित घडला हा.. असा तेंका वाटला...

संध्याकाळी पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेली बॉडी घेवन अंमब्यूलेन्स इली...
तेचा तोंड बघून...आवशीच्या हृदयात धडकीच भरली....

एप्रिल फूल असो सत्यात उतरात असा कोणाक वाटलेला नाय...
सकाळी आवाशीन रागन बोललेले शब्द नियतीन खरे करूचे सोडल्यान नाय

---सचिन आचरेकर

Monday, 28 March 2011

सावलीची सोबत...

सावलीची सोबत...

अंधार्‍या रात्री..रस्त्या वरच्या पोलाच्या उजेडात चालत होतो.
रस्त्यावर कोणच नव्हते...पण भीती वाटत नव्हती.
कारण मला माझाच सावलीची सोबत होती.

अर्धा रस्ता काटला होता अर्धा होता बाकी..
मध्येच लाइट गेली आणि मी राहिलो एकाकी.

कारण भारनियमनाला माझ्या सोबतीची खोट होती.

----सचिन आचरेकर

एक निरोप परीक्षा देणार्‍यांका...

एक निरोप परीक्षा देणार्‍यांका...

सगळयांचे परीक्षा चालू झाले.
अभ्यासाच्या नावा खाली सगळे दूर गेले.

आमका तुमची आठवण येतलि.
या नयनात आसवांची साठवण होतलि.

आमचे शुभेच्या आसत तुमच्या पाठी.
तेच्यामुळे परीक्षेची काय नाय भीती.

परीक्षा सरली काय परत येवा.
हयसरच आसा मालवणी मेवा.

---------सचिन आचरेकर

मला तुला आहे भेटायचाय.

मला तुला आहे भेटायचाय...
पण तू कोणालाही नाही सांगायचाय...

चौपाटी वरती जायचाय...
भेळ पुरी खायचाय...

खडकचा मागे जाउन..हळूच तुझ्या मिठीत यायचाय...
सागराचे तुषार अंगावर घ्यायचाय...

इतक्या दिवासातले तुला सांगायचाय...
तुझे बोलणे ऐकून घ्यायचाय..

मागच्या आठविनिया जागे करायचाय...
पुढच्या भेटीसाठी आठवणी ठेवायचाय...

मोबाइल ने तुझ्यासोबत फोटो काढायचाय...
आणि तुझ्या मिठीतच ऑटो ने घरी जायचाय...

-सचिन आचरेकर

तो.....

तो.....

तो आमच्या समोर राहायचा...
सारखा खिडकीतून मला बघायचा...
माझ्यावर प्रेम करायचा....
की नुसताच टाइमपास करायचा...

एक दिवस त्याने मला रस्त्यात गाठले....
माझ्या मनाने पण मानातच हसले.

घरातल्याना दुखवू की त्याला दुखवू.
मला काही कळेनासे झाले..
माझ्या मनाने शेवटी त्यालाच दुखावले..
माझे लग्न ठरलेय असे मी पकवले..

मला सांगायचा...
धुणी, भांडी आणि जेवण...
मी तुझ्यासाठी सगळे काही करीन...
तुला खूप सुखात ठेवीन..

अगदी वेड्या सारखा वागायचा...
दुःखी गाणी लावायचा...
येता जाता मलाच बघत बसायचा...
किती समजवले तरी परत मागे मागे यायचा...

तो खरच वेडा होता...
की..मी त्याला वेडावले होते...

का कोण जाणे आज तो घर सोडून जाताना..
माझ्याही डोळ्यात अश्रू होते.

---सचिन आचरेकर.

होळी स्पेशल....

होळी स्पेशल..

चाकरमान्यानु...
गावकडे जावूया......

साजरी करूया होळी..
खावया आवशीच्या हातची पुराणची पोळी...
चोरूया म्हादग्यॅची शेळई ..
लोकांका घालूया गाळी...

निशानानका पाया पाड्या...
सोंगा घेवाण शबय मागूया..
"आयण्यचा बायना" कानावर घालूया..
जमलेल्या पैशाची भांग आणूया..

शिमग्याचा गोमू बाघूक करूया गर्दी..
हरकत नाय भांग पिवन झाली जरी सर्दि..

होळीक नारळ देवुया..
बालपणिचे आठवणी जागे करूया..

चाकरमान्यानु...
शिमगो करुक गावकडे जावूया..

---------------------------- सचिन आचरेकर

Sunday, 27 March 2011

सुनामी.....

जपान मधे सुनामी आली होती तेव्हा मी ही कविता लिहिली होती...

सुनामी मधील एक मुलगी..जिचे आई वडील सुनामी मधे वाहून गेले..
समुद्राला उद्देशून बोलते आहे..

माझ्या आई-पप्पानी तुझे काय केले होते..
ज्याना तू माझ्यापासून हिरावून नेलेस?...
कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी..
माझ्या डोळ्यातील अश्रू थांबणार नाहीतू..
माझ्या पाया वरती कितीही वेळा लोटांगण घातलेस तरी.
मी तुला माफ करणार नाही.
----------------------सचिन आचरेकर

आयुष्य...........

आयुष्य...........

आयुष्यात काय कमावले काय गमावले..
याचा विचार करायचा नसतो.
आयुष्य येणार्‍या दिवसामागे..
कमी होत असते.
त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण..
एन्जॉय करायचा असतो.
किती जगलो यापेक्षा कसे जगलो..
याचा विचार करायचा असतो.
मला काय करायचे आहे आणि..
त्यासाठी मी काय करू शकतो.
आयुष्यात असे काहीतरी करायचे..
की लोकांच्या मनात घर करून राहावे.
या आयुष्यावर शतदा प्रेम करावे.
----------------------------- सचिन आचरेकर

सुख म्हणजे....

सुख म्हणजे....

आवाशीन बनायलेल्या जेवणाचो घास..
बहीनीचा हातून बांधून घेतलेली राखी..
भवाबरोबर खेळलेला "डब्ल्यू डब्ल्यू फ"
आजयेन लपवून थेयलेला कोंबद्याचा काळीज.
आंब्याचा झाडाचो तोडून खाल्लेलो आम्बो..
काजी चो खेळ खेळान जिंकलेले काजी.
न्हडित डुबकी मारुन केलेली आंघोळ.
गरवण पकडलेले माशे..
उसरा घराकडे इल्यार बापाशीचो वाढलेलो आवाज..
आजोबांची केलेली थट्टा-मस्करी...

बोरा, करवन्दा, फणस, जांभळा...
खेकडे, कालवा, बांगडे, सुर्मइ
ह्या सगळा सुख आमका इसराचा लागता पोटाची भागवक भूक...

------------------------------------सचिन आचरेकर