फेसबुक वर तिची ओळख झाली
तिचा ऑफिसमधला रिकामा वेळ ती माझ्याशी chat करून घालवू लागली..
मी मात्र वेड्यासारखा माझं काम बाजूला ठेवून तिच्याशी गप्पा मारायला लागलो..
कधी reply नाही दिला तर बोलायची....तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाही....
आणि सारखं piing करत रहायची...
मला वाटायचे ...माझी किती काळजी करते...माझ्यासाठी online येते..
बोलता बोलता..तिच्यावर मन कधी जडले कळलच नाही..
एकदा ती मला म्हणाली...मला एक मुलगा आवडतो...सांग मी काय करू?...
तो मुलगा मी नसणारच हे मनाला माहित होत...
असंख्य विचार मनामध्ये घोळू लागले..
ना कामात लक्ष ना जेवणावर....
ना कोणाशी बोलावेसे वाटत होते...
कोणी online बोलायला आले तर busy आहे अस सांगून शांत बसायचो..
विचार केला...एकदा मनातले सांगून मोकळे व्हायचे...
पण मनातला ऐकून ती मैत्री तर नाही तोडणार ना....
आणि ती नाही बोलली तर माझं दिवस कसा जायील...
असंख्य विचार.....आणि मनाची कासावीस..
पण एकदा तिला सांगूनच टाकले...
अपेक्षेप्रमाणे तिचा नकार आला.....
आता ती मला ignore करतेय...
माझ्याशी बोलणे म्हणजे डोकेदुखी झालीय...
पण मला तिच्यासोबत बोलल्याशिवाय चैन पडत नाही...
ती बोलली..असा कसा विचार करू शकतेस तू...मला फक्त मित्र हवाय...
मी बोललो तुला मित्र हवाय मग आयुष्य भारासाठी का नको...
ती म्हणे सगळ्यांशीच चांगली बोलते आणि सगळेच तिच्या प्रेमात पडतात....
पण असा का वागते...कि ज्याच्यामुळे एखाद्याला सवय होते..इतक्या जवळ का जाते?
कि दूर जाताना त्रास देवून जाते...
मी शांत आहे समजून घेयीन...पण..
माझ्यासारखा एखादा प्रेमवेडा असेल तो कदाचित आपले आयुष्य संपवेल...
तुझ्या विरहाने......
सचिन आचरेकर
06/12/2011
No comments:
Post a Comment