ओ गाववाल्यानु ऐकलास काय?
मी मुंबईतलो गिरणी कामगार..
गेली २९ वर्षा झगाडतय...
मिल बंद पडले...आणि गावाची वाट धरलय...
म्हटला.. गावकडे भाव बांधकी बरोबर...करीन शेती...
चार पैशे कामावन रवान सुखी...
भावाक वाटला ह्यो हिस्सो मगाक इलो...
तो पण अनोलख्या सर्खो वागाक लागलो...
एका घराचो येगळेचार केल्यान....
भावा-भावाचा नाता तोडल्यान....
माझ्यावाटयाक कमी हिस्सो दिल्याण...
वागीच भांडाणा नको म्हणान माझ्या मनं शांत रवल्याण...
जेव्हा कामक होतय...तेवा माका पत्रा धाडायचो...
दादा कधी यतलास... असा पत्रात लिवायचो....
माका रजा नाय...काम भरपूर आसा...
असा पत्रात लिवताना गावाची खूप आठवणी येयचो..
पण आता काय रवला नाय...
माझ्या हातात ४ पैशे नाय म्हणान कोण माका इचारणा नाय....
खूप केलव् आंदोलना आणि मोर्चे...
तेच्यावर राजकारण्यांनी मिळवलयानी खुर्चे...
आजुनय माझ्या पदरात काय पडाक नाय...
सत्ता मिळावक "मराठी माणूस" पण सोडलयानी नाय...
आता म्हणे... कामगरांका घरा देतले....
काय माहीत....? काय परत.....?
त्याच मुद्द्यावर राजकारण खेळतले??
सचिन आचरेकर
No comments:
Post a Comment