Friday, 30 September 2011

एक विचार...

ओ.... बाबा चला ना लवकर... काय पावला मोजत चाललाय...सांगत होतो नको
येवू...तुम्हाला झेपणार नाहीत तरीपण आलात....देवळातली आरती चालू व्हायची वेळ
झाली.. तुम्ही जर असे चाललात तर पोचायच्या आधी संपून जायील...थोडी पावले उचला
आता.....दोघेही देवळात पोचतात पण आरती अर्धी अधिक संपलेली असते आणि मुलगा
वैतागलेला असतो ...दोघेही घरी येतात....मुलगा चीड चीदेपणाने सगळ्यांशी बोलत
असतो.....बाबा शांतपणे घरात जातात आणि कपाटातून एक डायरी आणून एक पान उघडून
मुलाच्या हातात देतात...मुलगा वाचतो आणि ढसा ढसा रडायला लागतो...

आज पप्पू 2 वर्षाचा झाला आणि नेहमी उचलून घ्या म्हणून सांगणारा पहिल्यांदा
देवळा पर्यंत माझ्या हाताचे बोट पकडून चालत आला...त्यामुळे मला देवाची आरती तर
चुकली पण पप्पूला चालताना पाहून खूप समाधान वाटले म्हणून मी येताना दुकानातून
गुलाबजाम घेवून आलो.

सचिन आचरेकर

No comments:

Post a Comment