काल सहजच राणीच्या बागेत जावचा ठरवलव....
कोणीतरी सांगल्याण...बागेत आता राम नाय रवलो....
पण सगळे गणपती बघून थोडीशी विश्रांती घेवक गावातली म्हणून गेलव...
तिकीट कसला...बघण्यासारख्या काय नाय हा असा कोनतरी बोलला....
आतमधे ओळखीचो माणूस रवता...तेका भेटूचा कारण सुचला....
बागेत जाताना खाण्याचे पदार्थ आणि पाण्याचे बातले न्हेवक नाय दिल्यानि....
पशु पक्षांका त्रास देशात... ह्या कारण पुढे केल्यानी...
निरनिराळ्या प्राण्यांचे मोठे मोठे पिंजरे होते....
पण त्याच्यावर "दुरुस्ती साठी पिंजरा बंद आहे" अशे बोर्ड होते....
पिंजर्यांवर पक्षांची आणि प्राण्यांची नावा लिवलेली होती.....
पशु पक्षी गायब होते....आणि त्यांच्या नावांची पाटी पण गंजलेली होती...
पिंजरयाच्या आजु बाजुक चिखल झालेलो....
आपणाक कोण बाघूक येना नाय म्हणून सफेद कावलो पण कालो झालेलो....
पिंजरयात....कृत्रिम गुहा बनवलेली....
पण त्यात कोण असा की नाय... ता... शोधत माणसा भायर उभी रवलेलि....
एका पिंजरयात अस्वल निजलेला दिसला...
लोकानि कितीही उठवल्यानी तरी उठानार नाय असो पण करून बसलेला....
दोन पिंजरात वाघ गुहेमधेच झोपलेले होते...
कदाचित ते पण पिंजारो खाली करूच्या दिशेन प्रवास करीत होते...
दोन गेंड्ये आणि चार मगर एकदम शांत.. पाण्यात विसावलेले...
पोपट आणि लवबर्ड चिव चिव करत स्थिरावलेले....
रिकाम्या पिंजर्याआत कोण वाघ दाखय तर कोण कोल्हो दाखवायचो....
आणखीन चार लोक वाकन बघुक लागले की त्या माणसांचो पोपट व्हायचो....
पुढे गेल्यार एक माकड दिसलो....
१ रुपयाची नाणी पावसाच्या पाण्यात धुवत बसलेलो.....
कदाचित तो ह्याच सांगत होतो.....
तुमचो तिकीटाचो पैसो पाण्यात गेलो.....
सचिन आचरेकर
No comments:
Post a Comment