ही कविता माझ्या एका खास मित्राच्या जीवनाशी निगडीत आसा आणि माझो मित्राबद्दल झालेलो गैरसमज मी मांडूचो प्रयत्न
करतय...
मी माझ्या मित्राला याहू वरती मेल पाठवायचो...
लगेच त्याचा आलेला रिप्लाइ पाहून मी पण सुखवायचो...
[थोड्याच दिवसात......]
मी मेल्स करतच होतो...
पण रिप्लाइ काही येत नव्हता...
काय झालेय ते काही कळेना...
कॉंटॅक्ट करायला मोबाइल पण लागेना...
त्याच्या अशा वागण्याने माझे मन दुखावले होते...
समोर आला की जाब विचारायचे असे मी ठरवले होते...
असाच तो एक वर्षानंतर..फसेबूक वर भेटला...
मी विचारले काय रे मेल्स ना रिप्लाइ देत नाहीस...तू मला विसरला...
त्याचा रिप्लाइ आला...
मी याहू मेल्स ओपन केले की डोळ्यात पाणी येते...
मी मार्मिकपणे विचारले..याहू वर कापून ठेवलेयत का कांदे...
तो म्हणाला..
याहू च्या मेलबॉक्स मधे तिचे मेल्स आहेत..
ती सोडून गेली मला..ब्रेकअप करून..
तिचे नाव दिसले की तिच्या आठवणीने मन जाते भरून...
हे वाचून माझे पण मन गेले भरून...
मी अलगतच आसु पुसले स्वतःला सावरून...
---------------- सचिन आचरेकर
No comments:
Post a Comment