Sunday, 18 December 2011

सोशल नेटवर्किंग वेबसाईटस - नाती

सध्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटस मुळे बऱ्याच नवीन ओळखी होत आहेत. त्यामध्ये
काही ग्रुप्स बनत आहेत आणि त्या ग्रुप मध्ये वयातील अंतरामुळे दादा - ताई किवा
काका - मावशी अशी नाती बनत आहेत. सध्याच्या professional जीवनामध्ये खरच अशी
नाती बनवणे योग्य आहे का? कि फक्त मैत्रीचे नाते ठीक आहे? कारण अशा
नात्यांमुळे एक भावनिक ओढ निर्माण होते. मोबाईल, chat , SMS च्या माध्यमातून
संपर्क वाढतो आणि हीच नाती रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त जवळची वाटू लागतात.
त्यातूनच आपल्या सख्या नात्यांकडे दुर्लक्ष सुद्धा होवू शकतो. या नात्यांमुळे
अपेक्षा वाढतात आणि त्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही कि मन दुखावते. रोजच्या
बोलण्याने एक सवय जडून जाते आणि एक दिवस बोलणं नाही झाला तर कुठे मन रमत नाही.
नाती बनवताना आपण हे विसरून जातो कि समोरची व्यक्ती आपल नात किती seriously
घेत. म्हणजे तुम्ही एखाद्याला काका किवा मावशी बोलत असाल तर खरोखरच समोरच्या
व्यक्तीला ते नात आवडत का ? कि आवडत नसेल...समोरच्या व्यक्तीला आवडत असेल तर
ठीक आहे पण ती व्यक्ती या नात्याच्या जाहिरातीने दुखावली तर जात नाही
ना....जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी बहिण - भावाच नात जपतात तेव्हा ते नात
पुढे जावून डोईजड होवू शकते कारण आपली बहिण कुठेच चुकू नये अस प्रत्येक भावाला
वाटत असत... जर ती मुलगी कोणाच्या प्रेमात पडली तर ते कदाचित एक भाऊ या
नात्याने तुम्हाला समजणे जड जावू शकते. मुलीनी एक विचार केलेला असतो कि जेव्हा
लग्न होयील तेव्हा सासरचा नात जपायचं...त्यामुळे जेव्हा अशा बहिणीचा लग्न
होणार तेव्हा या नात्याचा सुद्धा अंत होवू शकतो कारण त्या मुलीच पुढील आयुष्य
हे सासरच्या माणसांवर अवलंबून असत आणि त्यासाठी प्रत्येक मुलीची तयारी
असते...त्यामुळे हा विचार मनात ठेवून जर तुम्ही एखाद्या मुलीला बहिण समजत असाल
तर ठीक आहे नाहीतर जर तुमचे मन sensitive असेल तर मैत्रीचे नात जोडणं हेच
चांगले अस मला वाटत..

कृपया हा लेख कोणीही वैयक्तिक घेवू नका....या लेखाचा आणि कोणत्याही व्यक्तीचा
प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष संबंध नाही आहे.
सचिन आचरेकर

1 comment:

  1. awesome dude mast lihil ahes mala patalya khi goshti

    ReplyDelete