Wednesday, 13 April 2011

"त्रेतायुग - कलियुग"

रामनवमी स्पेशल by सचिन आचरेकर

"त्रेतायुग - कलियुग"

त्या वेळचो काळ एगलो होतो नाय....
एकापेक्षा जास्त बायका करुक परवानगी होती..
पण प्रभू राम एकपात्नि रवले..

आणि आत्ताच्या काळात..
एकपात्नि चो कायदो असताना...
घरवाली असली तरी बाहरवाली होई असता...

सीता लंकेत रामाच्या नामस्मरणाने निर्धारान रवलि..
वनवासात रामासोबत येवचो हट्ट धरल्याण...
पातीविरह पेक्षा प्राणत्याग स्वीकारूचो ठरायल्याण....

आणि आत्ताच्या काळात...
नवरो गेलो तारवर आणि बायको रवली गुरुवार!!!!!!

पापी वालीचो वध करून..
"किशिंधा कोसळ" आपल्या देशाक न जोडता..
वानर राज शुद्रिवलाच अभिषिक्त केलात...

आणि आत्ताच्या काळात...
मुंबई महाराष्ट्राची की भारताची हेच्यार भांडणा होतात...

कैकेईच्या वरानुसार 14 वर्षे वनवास सोसलत...
भरतान पण तुमचे पदुका सिंहासनावर पुजून..
तुमचो प्रतिनिधी म्हणून राज्य केल्यान...
बंधू प्रेम आणि आई वडिलांची आज्ञा तुम्ही पाळलात.

आणि आत्ताच्या काळात...
आई वडिलांच्या सम्पति वरच्या हिस्शासाठी भावा भावात कोर्टात केशी चालतत.

रावणाचो वध करून फक्त सिते क प्राप्त करून घेतलास...
लंकेच्या राज पदी भीभिषानाकच बसयलात...
दुसर्‍याची भुमी, दुसर्‍याची सत्ता, समर्थ्या असताना पण नकारलात...

आणि आत्ताच्या काळात...
काश्मीर साठी हिंसाचार आणि लढाये घडतात...

राम तुमचो जन्मदिवस आम्ही रामनवमी म्हणून साजारो करतव....
पण तुमचो आदर्श घेवण आमच्या अंतरी रामजन्म घेवक मात्र आम्ही इसारतव...

-सचिन आचरेकर

Friday, 8 April 2011

मित्राबद्दल झालेलो गैरसमज

ही कविता माझ्या एका खास मित्राच्या जीवनाशी निगडीत आसा आणि माझो मित्राबद्दल झालेलो गैरसमज मी मांडूचो प्रयत्न
करतय...


मी माझ्या मित्राला याहू वरती मेल पाठवायचो...
लगेच त्याचा आलेला रिप्लाइ पाहून मी पण सुखवायचो...


[थोड्याच दिवसात......]
मी मेल्स करतच होतो...
पण रिप्लाइ काही येत नव्हता...

काय झालेय ते काही कळेना...
कॉंटॅक्ट करायला मोबाइल पण लागेना...

त्याच्या अशा वागण्याने माझे मन दुखावले होते...
समोर आला की जाब विचारायचे असे मी ठरवले होते...

असाच तो एक वर्षानंतर..फसेबूक वर भेटला...
मी विचारले काय रे मेल्स ना रिप्लाइ देत नाहीस...तू मला विसरला...

त्याचा रिप्लाइ आला...
मी याहू मेल्स ओपन केले की डोळ्यात पाणी येते...
मी मार्मिकपणे विचारले..याहू वर कापून ठेवलेयत का कांदे...

तो म्हणाला..
याहू च्या मेलबॉक्स मधे तिचे मेल्स आहेत..
ती सोडून गेली मला..ब्रेकअप करून..
तिचे नाव दिसले की तिच्या आठवणीने मन जाते भरून...

हे वाचून माझे पण मन गेले भरून...
मी अलगतच आसु पुसले स्वतःला सावरून...

---------------- सचिन आचरेकर

अण्णा स्पेशल....

अण्णा स्पेशल....

अण्णा तुमचो जयजयकार...
तुम्हीच दिलास आमका माहितीचो अधिकार...
मुळापासून निपटून काढूचो भ्रष्टाचार...
ह्यो तुमचो निर्धार...
तेच्यासाठी चालू केलास परत उपासमार..
तुम्ही कसलोच करू नको विचार...
तुमच्या पायावर लोळान घालतला...
ह्या आपला सरकार...
माझो तुमका सास्ष्टान्ग नमस्कार...

जय हिंद -- सचिन आचरेकर

वस्त्रहरण ......

वस्त्रहरण ..............

तिला फक्त प्रसिद्धी हवी होती...
त्यासाठी वर्ल्ड कप ची फाइनल याच्यापेक्षा दुसरी संधी कोणती होती...

केले तिने ऐलान..विवस्त्र होऊन मैदानाला फेरी मारण्याचे...
मीडीयाला मिळाला एक प्रॉजेक्ट..काहीतरी नवीन दाखवायचे...

जिला मूठभर लोका ओळखत होती...तिला दुनिया ओळखू लागली..
प्रसिद्धी साठी तिने प्रतिष्ठा चव्हात्या वर आणली...

द्रौपदीच्या दरबारातील वस्त्राहारणाने महाभारताचा इतिहास घडला..
28 वर्षा नंतर वर्ल्डकप चा पुन्हा इतिहास घडवण्यासाठी तिने वस्त्रहरनाचा मार्ग निवडला...

या देशात दुष्यासनाशिवाय तिला वस्त्राहारण करण्याची कुठून प्रेरणा मिळाली...
प्रसिद्ध व्हायच्या वेडात ती भारतीय संस्कृतीची अब्रू काढून गेली...

-------------------सचिन आचरेकर

मुलगी कधी वयात आली कळलच नाही....

मुलगी कधी वयात आली कळलच नाही....
जन्माला आली तेव्हा पासून लाडकी झाली...


शाळेत असताना पालक सभेला तिला बापच लागायचा...
बाप पण वेळात वेळ काढून हजर राहायचा...


बापाचे आवडताते उकडीचे मोदक आवरजुन बनवायची...
रोज सकाळी उठल्यावर न चुकता चहा बनवून द्यायची..

तिच्या आवडी निवडी बाप पण जपायचा..
तिचे हट्ट पुरवण्यासाठी वेगळे पैसे साठवायचा...
आपली मुलगी म्हणजे त्याला हृदयाचा तुकडा वाटायचा...


मुलगी आता मोठी झाली दुसर्‍याच्या घरी जाणार..
शोधनार मी तिच्यासाठी सुंदर राजकुमार...
असे सारखे म्हणायचा....


मुलगी मात्र आपले हृदय एका पर जातीतल्या गरीब मुलाला देऊन बसली होती...
बाबाना कसे सांगायचे या विचाराने ती खचली होती...

न सांगताच ती एक दिवस त्याच्या सोबत पळून गेली..
जाताना मात्र बपाच्या हृदयात ठिणगी पेटवून गेली.

आपला हृदयाचा तुकडा आपल्याला दुखवून गेला...
हे समजल्यावर त्याला हृदय विकराचा झटका आला...
दवाखान्यात नेताना वाटेतच तो जग सोडून गेला...

एकदा जरी तिने आपल्या मनातले सांगितले असते...
बापाने आनंदाने तिचे लग्न करून दिले असते...
कारण तिच्या सुखाशिवाय त्यालाही दुसरे काय हवे होते...

मुलगी कधी वयात आली कळलच नाही....
बपाच्या प्रेमाची जागा त्याने कधी घेतली कळलच नाही...

------------------सचिन आचरेकर

Friday, 1 April 2011

भारत X पाकिस्तान

भारत X पाकिस्तान चा क्रिकेट सामना...

काश्मीर चा वाद मिटवण्यासाठी..
भारत X पाकिस्तान चा क्रिकेट सामना खेळवावा...
जो जिंकेल त्याचे काश्मीर..

जवानांच्या आयुष्याशी खेळण्यापेक्षा..
क्रिकेट खेळलेले काय वाईट ???
-- सचिन आचरेकर

वर्ल्ड कप स्पेशल....

वर्ल्ड कप स्पेशल....

भारताने पाकिस्तानला धूळ चारली..
सगळ्या भारतात दिवाळी साजरी झाली..

मोहालीची पुनरावृत्ती मुंबईत होऊदे..
आफ्रिदी सारखे संगकाराला पण खाली हात जाउदे..

सचिनला भारत रत्न कधीही मिळूदे..
वर्ल्ड कप च्या स्वरुपात भारताला रत्न मिळूदे..

सचिन चे महशतक त्याच्याच जन्मभुमीत झळकुदे..
९६ च्या सेमी फाइनल चा वचपा निघुदे...


भारतीयांच्या डोळ्यान आनंदाश्रु वाहूदे..
पुन्हा एकदा भारतात दिवाळी साजरी होऊदे..


पुन्हा एकदा घडवा 1983 चा इतिहास ...
तमाम भारतीयांच्या मनात एकच ध्यास...

वर्ड कप वर भारताचा हक़क़ ही आमची इछा..
फाइनल साठी भारतीया संघाला मालवणी शुभेच्छा.

------सचिन आचरेकर