Monday, 12 March 2012

Charoli

खूप त्रास होतो ओल्या पापणीला
तुला दूर जाताना पाहताना...
तुला विसरायचे म्हणून...
मनाच्या विरोधी वागताना...
:(
सचिन आचरेकर

Jokes

अमित कानसेन customer care ला फोने केल्यान...
अमित कानसे: hello मी कानसे बोल रहा हून...
customer care अधिकारी: क्या मजाक कर राहे हो? कान से कोई बोल सकता है क्या?
आणि phone जोरात आपटून ठेवन दिल्यान :)
सचिन आचरेकर
sorry अमित just for TP राग नसावा :)

एक मुलगो एका मुलीचे सगळे commets like करत असता...
मुलगी: तुला माझ्या सगळ्याच comments आवडतात का रे?
मुलागो: हो ग comments काय...तू पण आवडतेस.
मुलगी: हो दादा..... thanks
मुलागो: नाही ग त्या comments एवढ्या फालतू आहेत म्हणून त्या कॉम्मेंत खाली unlike बघावसं वाटतंय.
:प
सचिन आचरेकर

Thursday, 2 February 2012

लफडा

हातात नांगर घेवन कुणग्यान कुणगो नंगार्ल्यान...
खिल्लारी बैलाच्या जोडीन बरी साथ दिल्यान...
सगळा कर्ज फेडूचा सपान तेनी बघितल्यान...
तरावो लावच्या येळाक पावसान दडी मारल्यान...
कोण सांगता मानसाच लफडी करतत...
निसर्गान सुद्धा माणसांका मागे टाकल्यान....
सचिन आचरेकर

Tuesday, 3 January 2012

मराठी भाषा

माझ्या भावाक एका कंपनी मधून क्रेडीट कार्ड साठी फोने इलेलो...सामोरचो माणूस हिंदीतसून बोला होतो...माझो भाव बोललो कि मराठीत बोल मका हिंदी कळत नाय...तो माणूस मराठीतसून बोललो आणि आड नावावार्सून तेनी विचारल्यान कि "सर... तुमचा गाव कोणता? माझ्या भावान मालवण म्हणून संगल्यावर ...दोघायाले मालवणीत बोलक लागले....तो माणूस सिंधुदुर्गातलोच होतो...तेका भावान विचारल्यान....तू मराठी माणूस मग हिंदीत सून कित्याक बोलतस.....तर तो बोललो कि अमका ट्रेनिंग असाच दिलेला हा....मित्रानु....आपल्या गावाकडच्या मुलांका/मुलींका भाषेच्या condition मुळे नोकरी मिळताना प्रोब्लेम्स होतत.... आणि किमान प्रत्येकान जे फोन calls येतत त्यांच्या सोबत जर मराठी बोलालाव तर मराठी भाषा बोलणाऱ्या साठी नक्कीच नोकरे उपलब्ध होतले...आणि नोकर्यांसाठी कसलच राजकारण सुद्धा होवचा नाय....
सचिन आचरेकर

Friday, 30 December 2011

मुलगी आणि तिचे समाजातील स्थान

आज आपण मुलगी आणि तिचे समाजातील स्थान या विषयावर चर्चा करूया...असा कुठेतरी वाचला कि भारता मध्ये दर वर्षी १० लाख नव जात बालिकेची हत्या केली जाते आणि म्हणून आपल्या देशात लिंग निदान चाचणी ला सरकारने बंदी घातली आहे...आज फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर स्त्री पुरुष प्रमाण १०००/९२६ असा आहे. उत्तरेकडील एका राज्यात..जर लग्न करायचे असेल तर मुलीला विकत आणावे लागते....अगदी सुरुवातीपासून मुलींबद्दल समाजाने द्वेषाची भूमिका का ठेवली आहे तेच काळात नाही...मुलीना शाळेत नाही पाठवायचे....पण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रयत्नाने सध्या मुलीना शिक्षण उपलब्ध आहे. पण मुलगी चे अति शिक्षण हेच तिच्या घाताचे ठरतेय....लग्न जमवताना हाच विचार केला जातो कि मुली चे शिक्षण आणि income हे मुलापेक्षा कमी आहे का? ..काय गरज आहे याची? संसार थाटताना दोघांचाही तेवढाच हाथभार असतो..मग हा विचार का केला जातो....जर बायको जास्त शिकलेली आणि जास्त कमावणारी असेल तर त्याचा अभिमान बाळगावा...

मी जेव्हा दुसरी-तिसरी ला होतो तेव्हा पुस्तकातले धडे अशेच होते..."गोपाळ शाळेत जा....लीला पाणी आण"...इथूनच जर भेदभाव शिकवत गेलो तर पुढे तेच विचार विकसित होत जातात...मुली सुद्धा याला जबाबदार आहेत....स्त्री-पुरुष समानता असताना का हवंय "स्त्रियांसाठी आरक्षण"... ते आरक्षण मागता म्हणजे तुम्ही दुसर्या भाषेत अजूनही कमकुवत आहात असा दाखवून देता.....माझ्या बर्याच मैत्रिणींकडून मी असा ऐकलय कि...लग्न झाल्यावर मला माझा नवरा जसा वागवेल तसा वागेन....मला समाजात नाही...लग्न करणे म्हणजे तुरुंगात जाने किवा एखाद्याची दासी बनून राहणे असे आहे का? मला एवढेच सांगायचे आहे कि....आत्मसन्मान बाळगा....स्वतःला कमी लेखू नका....आणि मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी आहे त्यामुळे तुमची मागणी वाढलेली आहे....योग्य असा जीवनसाथी निवडण्याचा तुमचा अधिकार आहे. मुलगा एका घराचे नव रोषण करतो तर मुली ला दोन घरांचे नाव रोषण करता येते. ते रोषण करायचे कि मान खाली घालवायला लावायची हे मुलीनु तुम्हीच ठरवा...

लग्न झाल्यावर जेव्हा मुलगा होत नाही तेव्हा स्त्रीला वांझोटी असा बोलून हिणवले जाते ...नवर्याच्या घरी काही अघटीत घडले तर पांढऱ्या पायाची अवदसा असा बोलला जात.... मुलगी जन्माला आली तरी स्त्री ला जबाबदार धरले जाते .पण science सांगते कि मुलगा किवा मुलगी होणे हे फक्त आणि फक्त पुरुषावर अवलंबून असते...स्त्री ने घरातील सर्व काम करून, मुलांना सांभाळून जॉब सुद्धा करावा ....किती अपेक्षा.....केवळ एक मुलगी आहे म्हणून.....तुमच्या घरात लग्न होवून आलेली मुलगी हि लक्ष्मि चे रूप असते...तिला दुखी ठेवून सुख मिळणार नाही....आणि केवळ विश्वासाच्या नात्याने आपल्या आई- पप्पा, मित्र-मैत्रिणी , भावू-बहिण सगळ्यांना सोडून आलेली असते....तिला समजून घेतले गेले पाहिजे...

राजा राम मोहन रॉय यांच्या सहकार्याने सती ची अनिष्ट प्रथा बंद झाली...महात्मा फुले यांच्या सहकार्याने समाजाने विधवा पुअर्विवाह मान्य केला...परंतु....जेव्हा तिच्या नवऱ्याचा देह अंत्यविधी साठी नेत असतात तेव्हा स्त्रियांच्या अंगावरील दागिने ज्या पद्धतीने काढले जातात , कपाळावरील कुंकू जबरदस्तीने पुसले जाते....हाताला काच लागेपर्यंत हातातील बांगड्या फोडल्या जातात.....आणि हे सर्व १०० -२०० पुरुषांच्या समोर होत असते....एक विचार करा...त्या स्त्री ला काय वाटत असेल...दुक्खातून सावरलेली पण नसेल ती आणि केवळ रूढी आणि परंपरा जपण्यासाठी अशी वागणूक देणे कितपत योग्य आहे....मी काही आगरकर यांच्यासारखा समाज सुधारक नाही..पण हि घाणेरडी प्रथा बंद व्हावी असा मनापासून वाटत....दागिने/कुंकू हे घरामध्ये कोणत्यातरी महिलेच्या हातून काढले जावेत....

सचिन आचरेकर

Thursday, 29 December 2011

मैत्री

मैत्री टाइमपास म्हणून करायची नसते किवा कोणीतरी कंपनी हवी म्हणून करायची नसते.....
दोन माणसे एकमेकाला भेटतात..बोलणे होते..विचार जूळतात..सहवास वाढतो आणि मैत्री होते.
मुलगा आणि मुलगी ची मैत्री असेल तर ती एक चर्चेचा विषय बनते...
पण मैत्री मधे गरज असते ती एकमेकांवरचा विश्वासाची, एकदुसर्‍याचा भावनांची.
मैत्री मधे एकमेकाचा सुखाचा साथीदार आणि दुखचा भागीदार वायचे असते..
मित्राने प्रामाणिक पाने दिलेले कॉमेंट्स आत्मसात करून आयुषात पुढे जायचे असते.
ब्लडग्रूप ओ + असला तरी लाइफ मधे बी+ राहायचे असते.
मित्रावरती रागवायचे असते पण थोड्या वेळाने परत एक वायचे असते..
कारण मैत्रीचे हे नाते कधीच टाइमपास नसते..ते आयुष्यभर जपायचे असते.